शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

50000 रुपयांचा मोबाईल 7500 ने स्वस्त होणार; इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे आणखी काही फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:27 IST

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते.

देशात स्मार्टफोन क्रांती घेऊन आला आहे. करोडो लोक एकमेकांसोबत जोडले गेले आहेत. फाईव्ह जी सेवा बहुतांश ठिकाणी सुरु झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने बजेटपूर्वी मोबाईल फोनच्या सुट्या भागांवर आकारली जाणारा आयात कर कमी केला आहे. यामुळे ५०००० रुपयांचा फोन साडे सात हजारांनी तर आयफोनसारखा महागडा लाख रुपयांचा फोन १५००० रुपयांनी कमी होणार आहे. 

इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे किंमत कमी होण्याबरोबरच आणखी काही फायदे देखील देशाला होणार आहेत. बॅटरी, मेन लेन्स आणि अन्य सुटे भाग यामध्ये १० टक्क्यांची कपात होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा डबल स्पीडने फायदा होणार आहे. स्मार्टफोन बनविण्याचा खर्च कमी होणार आहे. यामुळे मोबाईल मॅन्युफॅक्चरींगमध्ये वाढ होणार आहे. 

यामुळे अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार उपलब्ध झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. सरकारने मोबाईल फोन आणि त्याच्या पार्ट्सवरील आयात शुल्क हटवल्याने हाय-एंड स्मार्टफोनच्या निर्मितीला वेग येईल. कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या किंमती देखील त्या प्रमाणात कमी होतील. परंतु Apple, Samsung, Vivo आणि Oppo च्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. भारतात विकले जाणारे ९९.२ टक्के मोबाईल फोन देशातच बनवले जातात.

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते. आता भारतातच मेड इन स्मार्टफोन बनू लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. याला बुस्टर मिळण्यासाठी त्यांचे पार्ट्सचे दर कमी करण्यासाठी कर कमी करण्यात आला आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन