शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:25 IST

रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता.

रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती केलेली आहे. फोरजी नंतर ५जी आणत थेट देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी बनण्याचा मान मिळविला आहे. अशातच रिलायन्स जिओ टेलिकॉम मार्केटलाही दिशा देण्याचे काम करत आहे. काही वर्षांपूर्वी ४जी फ्री करून इतर कंपन्यांच्या रिचार्जच्या किंमती धडाधड उतरविल्या होत्या. आता जिओने वाढविल्यावर या कंपन्या वाढवत आहेत. अशातच आता जिओने त्यांचा सर्वात स्वस्त समजला जाणारा आणि सिम जिवंत ठेवणारा प्लॅनच गुपचूप हटविल्याने खळबळ उडाली आहे.

रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता. काही महिन्यांपूर्वी दर वाढविण्यापूर्वी हाच प्लॅन १५५ रुपयांना मिळत होता. तो जिओने हटविला आहे. यामुळे ग्राहक आता हा प्लॅन रिचार्ज करू शकणार नाहीत. तसेच ४७९ रुपयांचा प्लॅनही जिओने हटविला आहे. 

ट्रायच्या आदेशावरून कंपनीने फक्त कॉलिंग किंवा एसएमएस असलले प्लॅन आणले आहेत. अनेकजण एअरटेल, व्होडाफोन किंवा जिओचे इंटरनेट वापरत नव्हते. परंतू, या लोकांना सरसकट रिचार्ज मारावे लागत होते. यामुळे ट्रायने या लोकांसाठी वेगळे पर्याय असलेले प्लॅन आणण्याचे आदेश दिले होते. 

कंपन्यांनी हुशारी केलेली पण...ज्या किमतीत डेटा असलेले प्लॅन उपलब्ध होते त्याच किमतीत कंपन्यांनी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यानंतर ट्रायने सर्वच प्लॅनची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर कंपन्यांनी ते प्लॅन बंद करून नवीन कमी किंमतीचे प्लॅन बाजारात आणले आहेत. पूर्वी एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत ४९९ आणि १९५९ रुपये होती, पण आता किमतीत कपात केल्यानंतर या प्लॅनच्या नवीन किमती ४६९ आणि १८४९ रुपये करण्यात आल्या आहेत. हा फरक फार नसला तरी काही पैसे वाचविणारा आहे. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ