शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:19 IST

रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे

नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी वापरला जातो. असे असताना फसवणूक करणारे यशस्वी होतात. अनेक वेळा लोक स्वत: ओटीपी देतात, तर काही वेळा फसवणूक करणारे मोबाइल हॅक करून फसवणूक करतात. 

ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने अलर्ट सिस्टम आणण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी गृह मंत्रालय, एसबीआय कार्ड आणि टेलिकॉम ऑपरेटर एकत्रितपणे काम करत आहेत. या प्रणालीमध्ये फसवणूक करणाऱ्याने ग्राहकाचा ओटीपी घेतल्यास त्या व्यक्तीला धोक्याची सूचना दिली जाईल आणि फसवणूक थांबवता येईल.

ओटीपी मिळाला तरी फसवणूक होणार नाही रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक टाळण्यासाठी दोन पर्यायांवर काम केले जात आहे. ओटीपी डिलिव्हरीचे ठिकाण आणि ग्राहकाच्या सिमच्या लोकेशनमध्ये काही फरक असल्यास, एकतर डिव्हाइसवर एक अलर्ट पॉपअप केला जाईल किंवा ओटीपी पूर्णपणे ब्लॉक केला जाईल. यामुळे सायबर गुन्हेगारांना पेमेंट करण्यासाठी ओटीपी मिळाला तरी ते फसवणूक करू शकणार नाहीत.

नेमके काय करणार केंद्र सरकार? सिस्टममध्ये ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यासह त्याच्या सिमचे ठिकाण आणि ओटीपी कॉल केलेल्या ठिकाणाचा मेळ बसविण्यात येईल. त्यांच्यामध्ये काही फरक आढळल्यास, ग्राहकाला एक अलर्ट पाठविला जाईल की त्याची फसवणूक होऊ शकते. या योजनेनुसार, टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने ग्राहकांचा डेटाबेस तपासल्यानंतरच ओटीपी पाठवला जाईल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजी