शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mobile Subsidy Mukesh Ambani : गरीबांना मोबाइल सब्सिडी मिळावी, मुकेश अंबानी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:35 IST

Mobile Subsidy Mukesh Ambani : गरीबांना स्वस्तात मोबाइल खरेदी करता यावा यासाठी मोबाईलवरस सब्सिडी देण्याची मागणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली.

गरीबांना स्वस्तात मोबाइल खरेदी करता यावा यासाठी मोबाईलवरस सब्सिडी देण्याची मागणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली. मुकेश अंबानी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस २०२१ मध्ये यावर भाष्य केलं. “सरकारी युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडाचा वापर देशात मोबाइल सब्सिडी देण्यासाठी केला गेला पाहिजे. देशातील लोकांना जर डिजिटल ग्रोथचा भाग बनायचं असेल तर त्यांना परवडणाऱ्या दरात सेवा आणि डिव्हाइस उपलब्ध करुन दिली पाहिजे,” असं ते म्हणाले.

८ डिसेंबर रोजी मोबाइल इंडिया काँग्रेस २०२१ ची सुरुवात झाली. १० डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी 5G सेवा रोलआऊट करणं हे जियोचं प्राधान्य असल्याचं म्हटलं. “आम्ही १०० टक्के स्वदेशी आणि व्यापक 5G तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे पूर्णपणे क्लाऊड नेटिव्ह, डिजिटल मॅनेज्ड आणि भारतीय आहे. आमच्या या तंत्रज्ञानाच्या मदतीनं जिओ नेटवर्कला लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केलं जाऊ शकतं,” असंही ते म्हणाले.

डिजिटस ग्रोथसाठी स्वस्त फोन आवश्यकभारताला 2G मधून 4G आणि नंतर 5G मध्ये मायग्रेशन लवकरात लवकर पूर्ण करायला हवं. लाखो भारतीयांना 2G तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित ठेवणं म्हणजे त्यांना डिजिटल क्रांतीच्या लाभांपासून वंचित ठेवणं हे आहे. कोरोना महासाथीदरम्यान जेव्हा सर्वकाही बंद होतं तेव्हा केवळ इंटरनेट आणि मोबाइलमुळेच अनेक फायदे झाले. तंत्रज्ञान आपल्या जीवनाच आणि रोजगारासाठी मदतीचं ठरत असल्याचंही अंबानी म्हणाले.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीReliance Jioरिलायन्स जिओ