शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भीम ॲपद्वारे पैसे पाठवले, पोहोचले नाहीत; तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:32 IST

देणाऱ्याच्या बँक खात्यावर  रक्कम नावे टाकणे आणि घेणाऱ्याच्या खात्यावर जमा होणे हा व्यवहार तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नाही.

माझ्या वडिलांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी भीम ॲपद्वारे पॉलिसीचे ८०५०/- भरले. बँक खात्यातून रक्कम डेबिट झाली. पण, लाभार्थीच्या खात्यात मिळाली नाही. बँक हा प्रश्न सोडवत नाही. पैसे वसूल करण्यासाठी मी  काय करावे? 

भारत सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) या नावाचे पेमेंट ॲप तयार केले. त्याद्वारे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून साध्या, सोप्या आणि जलदगतीने व्यवहार करणे शक्य झाले. २००८ साली स्थापन केलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ह्या किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवणाऱ्या मध्यवर्ती संस्थेशी संलग्नता घेतली गेली. भीम ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः पैसे हाताळत नाहीत. पैसे देणारा पक्ष आणि पैसे स्वीकारणारा किंवा पैसे घेणारा पक्ष यांच्यातला – म्हणजे ह्यांच्या बँकांमधला दुवा म्हणून ते काम करते.

देणाऱ्याच्या बँक खात्यावर  रक्कम नावे टाकणे आणि घेणाऱ्याच्या खात्यावर जमा होणे हा व्यवहार तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. त्यावेळी असे घडण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते. अयशस्वी व्यवहाराबद्दल तक्रार करण्यासाठी, ‘अयशस्वी व्यवहारावर’ क्लिक केल्यानंतर ‘व्यवहार’मध्ये उपलब्ध ‘व्यवहार तपशील’ पृष्ठावरील ‘ राइज कंप्लेंट’वर क्लिक करा. साधारण तीन दिवसात रक्कम तुम्हाला परत केली जाते. 

तसे न झाल्यास तुम्ही भीम ॲपशी https://www.bhimupi.org.in/get-touch ह्या लिंकवर संपर्क साधू शकता. भीमॲपचा टोल फ्री नंबर १८०० १२० १७४० वर देखील तुम्हाला तक्रार दाखल करता येईल.  तांत्रिक चुकीसाठी तुमची बँकच जबाबदार असते. भारत सरकार आणि रिझर्व बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून भीम ॲप तयार झालेले असल्याने बँकांना ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्यावीच लागते. तुमच्या बँकेने प्रश्न न सोडवल्यास रिझर्व बँकेने स्थापन केलेल्या बँकांच्या लोकपालाकडे तुम्ही तुमच्या बँकेविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान