शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मिनिटभराच्या संभाषणासाठी 16.80 रुपये मोजावे लागायचे...मग मोबाईलचे बिल कसे स्वस्त झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 11:48 IST

मोबाईल फोनवर पहिले संभाषण 31 जुलै 1995 मध्ये झाले होते.

नवी दिल्ली : 1999 मध्ये मोबाईल सेवेने मोठी क्रांती केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने नवीन टेलिकॉम पॉलिसी लागू केली आणि एका मिनटाच्या कॉलचा दर 16.80 रुपये होता. आज या पॉलिसीमुळे काही पैशांत मिनिटभर बोलता येत आहे. महत्वाचे म्हणजे मोबाईल फोनवर पहिले संभाषण 31 जुलै 1995 मध्ये झाले होते.

1994 मध्ये नवीन टेलिकॉम पॉलिसी लागू करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान होते. यावेळी टेलिकॉम सेक्टरची वाढ ही 1.2 टक्के होती. 1999 मध्ये ही वाढ 2.3 टक्के झाली. याकाळात फोनवर बोलण्यासाठी एक मिनिटाला 16.80 रुपये लागत होते. याचे कारण असे होते की, टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्कच्या वापरासाठी प्रत्येक वर्षाला परवाना खरेदी करावा लागत असे, जो खूप महागडा होता. कंपन्यांना एका ग्राहकामागे 6023 रुपये वर्षाला द्यावे लागत होते. एवढे पैसे कंपनी ग्राहकांकडून वसूल करत होती. यामुळे एका मिनिटासाठी एवढे पैसे वसूल केले जात असत. मात्र, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने या परवाना शुल्कालाच लगाम घालत ते रद्द केले आणि महसूल विभागणी केली. 

यावेळी देशात जवळपास 22 टेलिकॉम ऑपरेटर होते. त्यांनी वाजपेयींना 7700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. यानंतर वाजपेयींनी हा निर्णय घेतला. या नुसार या कंपन्यांना महसुलाच्या 15 टक्के रक्कम सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे टेलिकॉम कंपन्याही फायद्यात आल्या. 

या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांनाही मिळू लागला. कॉलचे दर कमी झाले. 16.80 वरून काही वर्षांत ते 2.5 रुपयांवर आले. यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. ही संख्या वाढल्याने आणखी दर कमी झाले. या काळात इंटरनेट नसल्याने ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि मेसेजचे पैसे द्यावे लागत होते.