Microsoft CEO Satya Nadella: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वेगाने बदल घडवत आहे. या एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. परंतु मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञानाच्या या वेगाने मुलभूत गोष्टींचे महत्त्व कमी झालेले नाही. प्रसिद्ध टेक युट्यूबर सज्जाद खडे याच्याशी झालेल्या संभाषणात नडेला यांनी नवीन तांत्रिक व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचे सल्ला दिले आहेत.
एआयच्या युगात नोकरी कशी मिळवायची?नडेला म्हणाले की, जर तुम्हाला सॉफ्टवेअर अभियंता बनायचे असेल, तर तुम्हाला संगणकीय विचारसरणी आणि सिस्टम डिझाइनची मजबूत समज असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, सॉफ्टवेअरची खरी मूलभूत समज आजही खूप महत्त्वाची आहे. एआय कोडिंगमध्ये मदत करत असले तरी, ते चालवण्याची आणि योग्य दिशेने वापरण्याची क्षमता ही मानवाकडेच आहे.
सत्या नाडेला यांचा सल्ला सज्जाद खडे यांनी विचारले की, आजच्या एआय युगात नवीन टेक व्यावसायिकांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला कोणता असेल, तेव्हा नडेला म्हणाले, एआय निश्चितपणे कोड लिहू शकते, परंतु विचार करणे, समस्या योग्यरित्या समजून घेणे आणि रचना तयार करणे, हे अजूनही माणसाचे काम आहे.
नाडेला यांनी गिटहब कोपायलटच्या मदतीने त्यांच्या कोडमधील बग दुरुस्त केल्याचा वैयक्तिक अनुभवही सांगितला. त्यांनी सांगितले की, ते फिल्टर आणि पर्सेंटाइलसह एक फिचरस तयार करत आहेत, जिथे SQL चे ज्ञान त्यांना योग्य दिशेने विचार करण्यास मदत करत होते. AI ने काम निश्चितच सोपे केले, परंतु विचार करण्याचे काम मलाच करावे लागले, असेही त्यांनी म्हटले.
...पण मानवांची भूमिका संपणार नाहीमायक्रोसॉफ्टमध्ये AI चा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाडेला यांनी सांगितले की, कंपनीच्या अनेक प्रकल्पांमध्ये सुमारे 20 ते 30 टक्के कोड आता AI द्वारे लिहिले जात आहेत. यावरून असे दिसून येते की, येणाऱ्या काळात AI ची भूमिका आणखी वाढेल, परंतु मानवांची भूमिका संपणार नाही.
नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2025 मध्ये "एजेंटिक AI" चा देखील उल्लेख केला, जो भविष्यात तंत्रज्ञानाच्या प्रत्येक स्तरावर बदल घडवून आणणार आहे. तसेच, त्यांनी भारतात AI कौशल्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या (MeitY) सहकार्याने मायक्रोसॉफ्टने २०२६ पर्यंत ५ लाख लोकांना एआयशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
या अंतर्गत भारतातील १० राज्यांमध्ये २० एआय लॅबदेखील स्थापन केल्या जातील, जिथे २०,००० हून अधिक शिक्षकांना एआयचे मुख्य ज्ञान शिकवले जाईल. या संपूर्ण प्रयत्नाचा उद्देश भारतातील तरुणांनी तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावे आणि एआयशी चांगले समन्वय निर्माण करणे आहे.