शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

AI च्या काळात नोकरी कशी मिळवायची? Microsoft चे CEO सत्या नडेला म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:31 IST

Microsoft CEO Satya Nadella: 'तंत्रज्ञानाच्या या वेगाने मुलभूत गोष्टींचे महत्त्व कमी झालेले नाही.'

Microsoft CEO Satya Nadella: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वेगाने बदल घडवत आहे. या एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. परंतु मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञानाच्या या वेगाने मुलभूत गोष्टींचे महत्त्व कमी झालेले नाही. प्रसिद्ध टेक युट्यूबर सज्जाद खडे याच्याशी झालेल्या संभाषणात नडेला यांनी नवीन तांत्रिक व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचे सल्ला दिले आहेत.

एआयच्या युगात नोकरी कशी मिळवायची?नडेला म्हणाले की, जर तुम्हाला सॉफ्टवेअर अभियंता बनायचे असेल, तर तुम्हाला संगणकीय विचारसरणी आणि सिस्टम डिझाइनची मजबूत समज असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, सॉफ्टवेअरची खरी मूलभूत समज आजही खूप महत्त्वाची आहे. एआय कोडिंगमध्ये मदत करत असले तरी, ते चालवण्याची आणि योग्य दिशेने वापरण्याची क्षमता ही मानवाकडेच आहे.

सत्या नाडेला यांचा सल्ला सज्जाद खडे यांनी विचारले की, आजच्या एआय युगात नवीन टेक व्यावसायिकांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला कोणता असेल, तेव्हा नडेला म्हणाले, एआय निश्चितपणे कोड लिहू शकते, परंतु विचार करणे, समस्या योग्यरित्या समजून घेणे आणि रचना तयार करणे, हे अजूनही माणसाचे काम आहे.

नाडेला यांनी गिटहब कोपायलटच्या मदतीने त्यांच्या कोडमधील बग दुरुस्त केल्याचा वैयक्तिक अनुभवही सांगितला. त्यांनी सांगितले की, ते फिल्टर आणि पर्सेंटाइलसह एक फिचरस तयार करत आहेत, जिथे SQL चे ज्ञान त्यांना योग्य दिशेने विचार करण्यास मदत करत होते. AI ने काम निश्चितच सोपे केले, परंतु विचार करण्याचे काम मलाच करावे लागले, असेही त्यांनी म्हटले.

...पण मानवांची भूमिका संपणार नाहीमायक्रोसॉफ्टमध्ये AI चा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाडेला यांनी सांगितले की, कंपनीच्या अनेक प्रकल्पांमध्ये सुमारे 20 ते 30 टक्के कोड आता AI द्वारे लिहिले जात आहेत. यावरून असे दिसून येते की, येणाऱ्या काळात AI ची भूमिका आणखी वाढेल, परंतु मानवांची भूमिका संपणार नाही.

नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2025 मध्ये "एजेंटिक AI" चा देखील उल्लेख केला, जो भविष्यात तंत्रज्ञानाच्या प्रत्येक स्तरावर बदल घडवून आणणार आहे. तसेच, त्यांनी भारतात AI कौशल्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या (MeitY) सहकार्याने मायक्रोसॉफ्टने २०२६ पर्यंत ५ लाख लोकांना एआयशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. 

या अंतर्गत भारतातील १० राज्यांमध्ये २० एआय लॅबदेखील स्थापन केल्या जातील, जिथे २०,००० हून अधिक शिक्षकांना एआयचे मुख्य ज्ञान शिकवले जाईल. या संपूर्ण प्रयत्नाचा उद्देश भारतातील तरुणांनी तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावे आणि एआयशी चांगले समन्वय निर्माण करणे आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोjobनोकरी