शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारतीयांसाठी गुड न्यूज! ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनची विक्री वाढली; ‘ही’ कंपनी अग्रस्थानी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:07 IST

2022 च्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.  

2022 च्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतीयांना खुश करणारी बातमी समोर आली आहे. या कालावधीत 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. मेड इन इंडिया स्मार्टफोनची शिपमेंट Q1 2022 मध्ये 4.8 कोटी युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. काउंटरपॉइंटच्या टेक्नॉलॉजी मार्केट रिसर्चच्या मेक इन इंडिया सर्विसमधून या लेटेस्ट रिसर्चमधील डेटाचा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, या तीन महिन्यात सर्वाधिक 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची शिपमेंट ओप्पोनं केली आहे.  

मेड इन इंडिया स्मार्टफोनची विक्री वाढली  

लोकल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टमबाबत बोलताना, सीनियर रिसर्च अनॅलिस्ट प्रचिर सिंह यांनी म्हटलं आहे की, "भारतात स्मार्टफोन निर्मिती वाढली आहे. 2021 मध्ये 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची शिपमेंट 19 कोटी युनिट्स पेक्षा जास्त होती. भारतातील वाढती मागणी तसेच निर्यात यामुळे यात वाढ झाली आहे. तसेच स्थानिक निर्मिती वाढवण्याची सरकारकडून देखील प्रोत्साहन मिळालं आहे."   

वर सांगितल्याप्रमाणे ओप्पो 2022 च्या पहिल्या तिमाहीत 22 टक्के वाढीसह मेड इन इंडिया स्मार्टफोन शिपमेंटमध्ये सर्वात पुढे आहे. तर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं या कालावधीत 21 टक्के वार्षिक वाढ पहिली आहे. सॅमसंग दुसऱ्या स्थानी आहे.  

फीचर फोन्सची मागणी घटली 

रिपोर्टमधून फिचर फोन्सच्या बाजाराची देखील माहिती मिळाली आहे. त्यानुसार 2022 च्या पाहिल्यात तिमाहीत फीचर फोनची निर्मिती गेल्या वर्षीच्या तुलनेत 41 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फीचर फोनची मागणी कमी होत आहे. रिपोर्टनुसार, या सेगमेंटमध्ये स्वदेशी कंपनी लावानं 2022 च्या पहिल्या तिमाहीत 21 टक्के बाजारावर कब्जा करत 'मेड इन इंडिया' फीचर फोन शिपमेंटमध्ये पाहिलं स्थान मिळवलं आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन