शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नेटवर्क नाही, रिचार्ज महागले; लाखो ग्राहकांनी घेतला Jio चा निरोप, ‘या’ कंपनीला दिली पसंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:12 IST

रिचार्ज महागल्यापासून Jio चे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. तसेच Vodafone Idea देखील ग्राहक गमावत आहे.  

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI चा ताजा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतातील टेलिकॉम कंपन्यांच्या सब्सक्रायबर्सची फेब्रुवारी 2022 च्या शेवटी असलेली संख्या समोर आली आहे. त्यानुसार, अजूनही Jio आणि Vodafone idea च्या ग्राहक संख्येत घट सुरु आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिचार्ज वाढवल्यापासून या कंपन्यांचे ग्राहक कमी होत आहेत.  

याउलट जानेवारी प्रमाणे फेब्रुवारीमध्ये देखील Airtel अशी एकमेव टेलीकॉम कंपनी होती, जिच्या सब्सक्रायबर्सची संख्या वाढली आहे. ताज्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये एयरटेलनं 1.59 मिलियन नवीन सब्सक्रायबर्स जोडले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कंपनीकडे एकूण 358.07 मिलियन सब्सक्रायबर्स झाले आहेत.  

Reliance Jio कडे पाहता, कंपनीनं फेब्रुवारीमध्ये 3.66 मिलियन युजर्सना गमावले आहेत, त्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या फेब्रुवारीच्या शेवटी 402.73 मिलियन इतकी राहिली आहे. Vodafone Idea चे सब्सक्रायबर्स देखील पुन्हा एकदा घटले आहेत. फेब्रुवारीमध्ये 1.53 मिलियन सब्सक्रायबर्सनी ‘व्ही’ चा निरोप घेतला आहे, सध्या फक्त 263.59 सब्सक्रायबर्स उरले आहेत.  

भारतातील वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्या कमी झाली 

भारतातील एकूण वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्याच घटली आहे. जानेवारीत 1,145.24 मिलियन युजर्स होते, फेब्रुवारीच्या शेवटी फक्त 1,141.53 मिलियन युजर्स वायरलेस नेटवर्कवर होते. यात Jio 35.28% मार्केट शेयरसह सर्वात मोठी कंपनी आहे. 31.37 मार्केट शेयरसह Airtel दुसऱ्या आणि वोडाफोन आयडिया 23.09% सह तिसऱ्या नंबरवर आहे. तर सरकारी कंपनी BSNL कडे 9.98%, तर MTNL कडे 0.28% मार्केट शेयर आहे.  

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायJioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन