शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:21 IST

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत.

देशात ५जी लाँच होऊन आता दोन महिने होत आले आहेत. परंतू, ग्राहकांमध्ये आता एअरटेल आणि जिओने फसवल्याची भावना तयार होऊ लागली आहे. एअरटेलने १३ शहरांत तर जिओने ८ शहरांत ५जी नेटवर्क लाँच केल्याचा दावा केला आहे. परंतू, जशी २जी लाँच झालेले तेव्हा लोक रेंज घेत फिरायचे तशी परिस्थिती आता लोकांवर पुन्हा आली आहे. 

मुंबईत जिओने ५जी लाँच केले, परंतू अनेक भागात फिरूनही ५जी सापडलेले नाही. याबाबत जिओला विचारले असता जिओच्या कस्टमर केअरचे उत्तर तुमच्याकडे ५जी फोन असावा, अपडेट असावा आणि ५जी सुरु असलेल्या कव्हरेज म्हणजेच टॉवरच्या क्षेत्रात असावा, अमूक पेक्षा जास्त रिचार्ज हवे, असे सांगितले.

एअरटेलच्या फाईव्ह जीची देखील अशीच अवस्था आहे. दोन्ही कंपन्यांनी शोधुन सापडणार नाही अशा ठिकाणी ५जी सेवा सुरु केली आहे. यामुळे ही यंत्रणा ज्या टॉवरवर बसवली आहे, तिथे राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना ५जी मिळत आहे. इतर लोक दोन महिने उलटले तरी वाट पाहत आहेत. 

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. परंतू ते अपडेट केले, सेटिंग बदलले असले तरी त्यांना ५जी स्पीड सोडा चिन्हही दिसत नाहीय. सुरुवातीला कंपन्यांनी शहरांची नावे, नंबर जाहीर केले होते. या शहरभरात याची सेवा एकाचवेळी सुरु होईल असे वाटले होते. परंतू, कंपन्यांनी ५जी सेवा निवडक ठिकाणी, निवडक लोकांसाठीच सुरु केली आहे. कंपन्यांनी एकेक शहर एकाचवेळी ५जी करायला हवे होते, उगाचच हवा करण्यात आल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

कंपन्यांनी पुढील वर्षाच्या किंवा २०२४ च्या अखेरपर्यंत देशभरात ५जी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आता देशातही याचप्रमाणे ५जी सेवा सुरु करण्याचा वेग राहिला तर २०२४ उलटला तरी ५जी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यातले त्यात व्होडाफोन आयडियाने काहीच न करून लोकांना कमीतकमी उल्लू तरी बनविले नाही, अशी भावना मोबाईल युजर्समध्ये आहे. 

टॅग्स :5G५जी