शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:21 IST

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत.

देशात ५जी लाँच होऊन आता दोन महिने होत आले आहेत. परंतू, ग्राहकांमध्ये आता एअरटेल आणि जिओने फसवल्याची भावना तयार होऊ लागली आहे. एअरटेलने १३ शहरांत तर जिओने ८ शहरांत ५जी नेटवर्क लाँच केल्याचा दावा केला आहे. परंतू, जशी २जी लाँच झालेले तेव्हा लोक रेंज घेत फिरायचे तशी परिस्थिती आता लोकांवर पुन्हा आली आहे. 

मुंबईत जिओने ५जी लाँच केले, परंतू अनेक भागात फिरूनही ५जी सापडलेले नाही. याबाबत जिओला विचारले असता जिओच्या कस्टमर केअरचे उत्तर तुमच्याकडे ५जी फोन असावा, अपडेट असावा आणि ५जी सुरु असलेल्या कव्हरेज म्हणजेच टॉवरच्या क्षेत्रात असावा, अमूक पेक्षा जास्त रिचार्ज हवे, असे सांगितले.

एअरटेलच्या फाईव्ह जीची देखील अशीच अवस्था आहे. दोन्ही कंपन्यांनी शोधुन सापडणार नाही अशा ठिकाणी ५जी सेवा सुरु केली आहे. यामुळे ही यंत्रणा ज्या टॉवरवर बसवली आहे, तिथे राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना ५जी मिळत आहे. इतर लोक दोन महिने उलटले तरी वाट पाहत आहेत. 

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. परंतू ते अपडेट केले, सेटिंग बदलले असले तरी त्यांना ५जी स्पीड सोडा चिन्हही दिसत नाहीय. सुरुवातीला कंपन्यांनी शहरांची नावे, नंबर जाहीर केले होते. या शहरभरात याची सेवा एकाचवेळी सुरु होईल असे वाटले होते. परंतू, कंपन्यांनी ५जी सेवा निवडक ठिकाणी, निवडक लोकांसाठीच सुरु केली आहे. कंपन्यांनी एकेक शहर एकाचवेळी ५जी करायला हवे होते, उगाचच हवा करण्यात आल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

कंपन्यांनी पुढील वर्षाच्या किंवा २०२४ च्या अखेरपर्यंत देशभरात ५जी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आता देशातही याचप्रमाणे ५जी सेवा सुरु करण्याचा वेग राहिला तर २०२४ उलटला तरी ५जी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यातले त्यात व्होडाफोन आयडियाने काहीच न करून लोकांना कमीतकमी उल्लू तरी बनविले नाही, अशी भावना मोबाईल युजर्समध्ये आहे. 

टॅग्स :5G५जी