शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:21 IST

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत.

देशात ५जी लाँच होऊन आता दोन महिने होत आले आहेत. परंतू, ग्राहकांमध्ये आता एअरटेल आणि जिओने फसवल्याची भावना तयार होऊ लागली आहे. एअरटेलने १३ शहरांत तर जिओने ८ शहरांत ५जी नेटवर्क लाँच केल्याचा दावा केला आहे. परंतू, जशी २जी लाँच झालेले तेव्हा लोक रेंज घेत फिरायचे तशी परिस्थिती आता लोकांवर पुन्हा आली आहे. 

मुंबईत जिओने ५जी लाँच केले, परंतू अनेक भागात फिरूनही ५जी सापडलेले नाही. याबाबत जिओला विचारले असता जिओच्या कस्टमर केअरचे उत्तर तुमच्याकडे ५जी फोन असावा, अपडेट असावा आणि ५जी सुरु असलेल्या कव्हरेज म्हणजेच टॉवरच्या क्षेत्रात असावा, अमूक पेक्षा जास्त रिचार्ज हवे, असे सांगितले.

एअरटेलच्या फाईव्ह जीची देखील अशीच अवस्था आहे. दोन्ही कंपन्यांनी शोधुन सापडणार नाही अशा ठिकाणी ५जी सेवा सुरु केली आहे. यामुळे ही यंत्रणा ज्या टॉवरवर बसवली आहे, तिथे राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना ५जी मिळत आहे. इतर लोक दोन महिने उलटले तरी वाट पाहत आहेत. 

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. परंतू ते अपडेट केले, सेटिंग बदलले असले तरी त्यांना ५जी स्पीड सोडा चिन्हही दिसत नाहीय. सुरुवातीला कंपन्यांनी शहरांची नावे, नंबर जाहीर केले होते. या शहरभरात याची सेवा एकाचवेळी सुरु होईल असे वाटले होते. परंतू, कंपन्यांनी ५जी सेवा निवडक ठिकाणी, निवडक लोकांसाठीच सुरु केली आहे. कंपन्यांनी एकेक शहर एकाचवेळी ५जी करायला हवे होते, उगाचच हवा करण्यात आल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

कंपन्यांनी पुढील वर्षाच्या किंवा २०२४ च्या अखेरपर्यंत देशभरात ५जी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आता देशातही याचप्रमाणे ५जी सेवा सुरु करण्याचा वेग राहिला तर २०२४ उलटला तरी ५जी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यातले त्यात व्होडाफोन आयडियाने काहीच न करून लोकांना कमीतकमी उल्लू तरी बनविले नाही, अशी भावना मोबाईल युजर्समध्ये आहे. 

टॅग्स :5G५जी