शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

5G लाँच होऊन दोन महिने होत आले, शोधून शोधून सापडेना; एअरटेल, जिओने उल्लू बनविले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:21 IST

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत.

देशात ५जी लाँच होऊन आता दोन महिने होत आले आहेत. परंतू, ग्राहकांमध्ये आता एअरटेल आणि जिओने फसवल्याची भावना तयार होऊ लागली आहे. एअरटेलने १३ शहरांत तर जिओने ८ शहरांत ५जी नेटवर्क लाँच केल्याचा दावा केला आहे. परंतू, जशी २जी लाँच झालेले तेव्हा लोक रेंज घेत फिरायचे तशी परिस्थिती आता लोकांवर पुन्हा आली आहे. 

मुंबईत जिओने ५जी लाँच केले, परंतू अनेक भागात फिरूनही ५जी सापडलेले नाही. याबाबत जिओला विचारले असता जिओच्या कस्टमर केअरचे उत्तर तुमच्याकडे ५जी फोन असावा, अपडेट असावा आणि ५जी सुरु असलेल्या कव्हरेज म्हणजेच टॉवरच्या क्षेत्रात असावा, अमूक पेक्षा जास्त रिचार्ज हवे, असे सांगितले.

एअरटेलच्या फाईव्ह जीची देखील अशीच अवस्था आहे. दोन्ही कंपन्यांनी शोधुन सापडणार नाही अशा ठिकाणी ५जी सेवा सुरु केली आहे. यामुळे ही यंत्रणा ज्या टॉवरवर बसवली आहे, तिथे राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना ५जी मिळत आहे. इतर लोक दोन महिने उलटले तरी वाट पाहत आहेत. 

कंपन्यांनी घाई केल्याचे आता ग्राहकवर्गात बोलले जात आहे. अनेकांनी ५जी फोन घेतले आहेत. परंतू ते अपडेट केले, सेटिंग बदलले असले तरी त्यांना ५जी स्पीड सोडा चिन्हही दिसत नाहीय. सुरुवातीला कंपन्यांनी शहरांची नावे, नंबर जाहीर केले होते. या शहरभरात याची सेवा एकाचवेळी सुरु होईल असे वाटले होते. परंतू, कंपन्यांनी ५जी सेवा निवडक ठिकाणी, निवडक लोकांसाठीच सुरु केली आहे. कंपन्यांनी एकेक शहर एकाचवेळी ५जी करायला हवे होते, उगाचच हवा करण्यात आल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

कंपन्यांनी पुढील वर्षाच्या किंवा २०२४ च्या अखेरपर्यंत देशभरात ५जी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आता देशातही याचप्रमाणे ५जी सेवा सुरु करण्याचा वेग राहिला तर २०२४ उलटला तरी ५जी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. त्यातले त्यात व्होडाफोन आयडियाने काहीच न करून लोकांना कमीतकमी उल्लू तरी बनविले नाही, अशी भावना मोबाईल युजर्समध्ये आहे. 

टॅग्स :5G५जी