शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:43 IST

भारत सध्या जगभरातील हॅकर्ससाठीदेखील ‘कमाईचा मोठा स्रोत’ होऊन बसला आहे!

- प्रसाद ताम्हनकर‘आयबीएम’ ह्या जगप्रसिद्ध कंपनीच्या ‘एक्स-फोर्स थ्रेट’ अहवालानुसार आशिया प्रांतात जपाननंतर सर्वाधिक सायबर हल्ल्यांचा शिकार झालेला देश भारत आहे. २०२० साली आशियात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ७% हल्ले हे एकट्या भारतावर करण्यात आले. प्रसिद्ध उत्पादनांचा नकली माल गळ्यात मारून,  डाटा लीक करण्याची धमकी देऊन अनेक भारतीयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला.  सगळ्यात जास्ती, म्हणजे ६०% हल्ले हे फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांवर करण्यात आले. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवाक्षेत्राचा नंबर आहे.

भारतावर करण्यात आलेल्या एकूण हल्ल्यांपैकी ४०% हल्ले हे ‘रॅन्समवेअर’द्वारे करण्यात आले आहेत. ह्यात युजर्सचा संगणक लॉक करून अथवा डाटा एन्क्रिप्टेड करून तो सोडण्यासाठी खंडणीची मागणी करण्यात येते. अन्यथा डाटा लीक करण्याची धमकी  देण्यात येते. २०२० सालात ‘सोदिनोकिबी (Sodinokibi)’ ह्या अत्यंत घातकी मानल्या जाणाऱ्या हॅकर्स ग्रुपने सर्वाधिक धुमाकूळ घातला. गतसालातले २२% हल्ले हे ह्या एकट्या हॅकर्स ग्रुपने केलेले आहेत.

सोदिनोकिबी गटाने जगभरातील  निरपराध लोकांना लक्ष्य करून, त्यांचा २१.६ टीबी येवढा प्रचंड डाटा चोरला. ह्या पीडितांपैकी २/३ लोकांनी खंडणी देऊन आपल्या डाटाची सुटका करून घेतली, तर ४३% डाटा ह्या गटाकडून लीक करण्यात आला.  आयबीएमच्या अहवालानुसार, सोदिनोकिबीने गतसाली जगभरातून खंडणीपोटी ८९० कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. जुलै महिन्यात भारतावर सगळ्यात जास्ती सायबर हल्ले करण्यात आले. गूगल, पे-पालपासून ते आदिदासपर्यंत अनेक जगप्रसिद्ध ब्रॅण्डसची हुबेहूब नक्कल करीत हॅकर्सनी अनेक भारतीयांना गंडा घातला.

भविष्यात क्लाऊड सर्व्हिसेस वापरणे अनिवार्य होईल. या सर्व्हिसेसवरती हल्ले होण्याची शक्यताही  बळावेल. सर्वच कंपन्यांनी ‘कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंग’सारख्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर सुरक्षित राहण्यासाठी करण्याची गरज असल्याचेदेखील ह्या अहवालात सांगितले आहे. ह्या तंत्रज्ञानात डाटा प्रोसेस होत असतानाच ‘इन्क्रिप्ट’ केला जात असल्याने, तो अधिक सुरक्षित राहतो.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतchinaचीनtechnologyतंत्रज्ञान