शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता तुमचं गाव झळकणार फेसबुकवर!, एका क्लिकवर सर्व माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:58 IST

गावात नव्याने काय चालले आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावाचे ऐतिहासिक महत्व काय, गावाची यशोगाथा यांसह अनेक बाबींची  महत्वाची माहिती फेसबुकवर मिळणार आहे.

मुंबई - सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून माणसे एकमेकांनी जोडली गेली आहेत. तसेच माहिती व संदेशांची देवाणघेवाणही अगदी काही सेकंदात होत आहे. माहितीसाठी ताटकळत राहण्याचे दिवस आता संपले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या साधनांचा आता सरकारी कामकाजातही वापर वाढला आहे.

याचाच एक भाग म्हणून फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावाचे म्हणजे, जवळपास 44 हजार गावांचे 'व्हिलेजबुक पेज' तयार करण्याचा उपक्रम ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. या पेजवर गावात नव्याने काय चालले आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावाचे ऐतिहासिक महत्व काय, गावाची यशोगाथा यांसह अनेक बाबींची  महत्वाची माहिती या पाहता येईल. 

सरकारी योजनांची माहिती, गावातील कामकाजाचा आढावा आणि संदेश गावागावात पोहोचवता यावेत यासाठी फेसबूकची मदत घेण्याचे सरकारने ठरवले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील नागरिकाला आपल्या गावाशी संपर्क साधता यावा, गावाची माहिती मिळावी यासाठी गावाचे फेसबूक पेज तयार केले जात आहे. या पेजमध्ये गावाची सर्व माहिती दिली जाणार आहे. सरकारी योजना, गावांतील योजनांची माहितीसह अन्य महत्वाची माहिती या पेजवर एका क्लिकवर पाहता येईल. 

या मोहिमेस लवकरच नगर जिल्ह्यातून  सुरुवात होणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने स्वतःचे पेज तयार केले असून या प्रमाणेच गावांचे पेज तयार केले जाणार आहे. या पेजवर व्हीडीओ कॉलिंग, कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे महत्वाच्या बैठका असल्यास प्रत्येक वेळी ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज राहणार नाही. या सुविधेद्वारे मुख्यमंत्र्यांपासून जिल्हा परिषदेच्या सीईओंपर्यंत वरिष्ठ अधिकारी काही वेळात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकणार आहेत. त्यामुळे पेज तयार झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा, नागरिकांनी कशा पद्धतीने संपर्क साधावा, माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे, याची माहिती संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.   

टॅग्स :FacebookफेसबुकState Governmentराज्य सरकार