शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

मोदी सरकार चीनी कंपन्यांना मोठा दणका देणार! १२ हजारापर्यंतच्या स्मार्टफोनवर बंदी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:25 IST

चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे.

चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे. पण चीनीस्मार्टफोन कंपन्यांमुळे स्थानिक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना मोठं नुकसान भोगावं लागत आहे. नुकतंच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार भारत सरकार आता देशात १२ हजार रुपयांपर्यंतच्या चीनी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी करत आहे. 

चीनी स्मार्टफोन कंपन्या परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केल्यामुळे Lava आणि Micromax सारख्या भारतीय स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपली हिस्सेदारी गमावली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांना पाठिंबा देण्याची भूमिका सरकारची असली तरी यातून चीनला धक्का देण्याचा मनसुबा आखण्यात आला आहे. १२ हजार रुपयांच्या घरात येणाऱ्या सर्व चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याची तयारी भारत सरकारनं केली आहे. 

भारतात जर असं पाऊल उचललं गेलं तर यात शाओमीसह अनेक चीनी कंपन्यांना मोठा झटका बसणार आहे. या क्षणाला भारत सरकार या किंमतीच्या श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च करणार्‍या चीनी कंपन्यांना धक्का देण्याचे धोरण जाहीर करेल की अनौपचारिक माध्यमांद्वारे चीनी कंपन्यांना याची माहिती देईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 

जूनच्या तिमाहीत १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचा ८० टक्के वाटा आहे. २०२० पासून सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील चीनी कंपन्यांना व्यवसाय करणं कठीण होऊ लागलं आहे. सरकारनं हळूहळू चीनी मोबाइल अॅप्सवरही बंदी घातली आणि आता १२ हजारापेक्षा कमी किमतीच्या चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याचा सरकारचा इरादा आहे. 

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनchinaचीनtechnologyतंत्रज्ञान