शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर वाढला; "इतका" वेळ फोनवर खर्च करतात भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 17:19 IST

Average Smartphone Time in India : कोरोनाच्या संकटात लोकांच्या स्क्रिनटाईम म्हणजेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर घालवण्यात आलेला वेळ वाढता आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता सध्या कोरोनाच्या काळात त्याचा वापर हा आणखी वाढल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांच्या स्क्रिनटाईम म्हणजेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर घालवण्यात आलेला वेळ वाढता आहे. स्मार्टफनन तयार करणारी कंपनी वीवोने भारतात स्मार्टफोनचा वापर किती वेळ केला जातो याबाबत एक सर्व्हे जारी केला आहे. यामध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनच्या वापरात 25 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे. 

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि मनोरंजन आणि इतर गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. लोक आपल्या गरजेनुसार या गॅजेट्सचा वापर करतात. सीएमआरने मोबाईल कंपनी वीवोच्या वतीने हा रिसर्च केला आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनचा वापर 11 टक्क्यांनी वाढून 5.5 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. तर एप्रिलमध्ये 25 टक्के आणखी वाढून 6.9 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. हाच वेळ 2019 मध्ये सरासरी 4.9 तास होता. 

स्मार्टफोन आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम - 2020 या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर भारतीय आपल्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होमसाठी स्मार्टफोनचा वापर 75 टक्क्यांनी वाढला आहे. तर कॉलिंगसाठी 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नेटफ्लिक्स, स्पॉटिफायसारख्या ओव्हर द टॉप सेवांसाठी स्मार्टफोनच्या वापरात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं

सोशल मीडियासाठी स्मार्टफोनचा वापर 55 टक्क्यांनी वाढला आहे. स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेमिंगसाठी यात 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोनचा वापर प्रतिदिन 14 मिनिटांनी वाढून 18 मिनिटांवर पोहचला आहे. या रिसर्चमध्ये आठ शहरांतील 15 ते 45 वयोगटातील जवळपास 2000 लोकांची मतं घेण्यात आली. यात 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे.

वीवो इंडियाचे संचालक निपुण मार्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कंपनीने अशाच प्रकारचा रिसर्च गेल्या वर्षीही केला होता. स्मार्टफोन हे सर्वात उत्तम माध्यम असल्याचं सर्वच जाणतात. खासकरून कोरोना काळात स्मार्टफोन अतिशय महत्त्वाचा ठरला. मात्र स्मार्टफोनच्या अति वापराचा प्रतिकूल परिणाम होतो. स्मार्टफोनचं एडिक्शन होत आहे. 84 टक्के लोकांनी ते सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पहिले 15 मिनिटं फोन बघत असल्याचं सांगितलं."

"कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल"

जवळपास 46 लोकांनी ते मित्रांसोबत एका तासाच्या बैठकीवेळी कमीत-कमी पाच वेळा आपला फोन उचलतात असं सांगितलं. कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल, काही बदल होतील. मात्र कोरोना काळात झालेले काही बदल कायम राहतील असं देखील निपुण मार्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान