शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर वाढला; "इतका" वेळ फोनवर खर्च करतात भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 17:19 IST

Average Smartphone Time in India : कोरोनाच्या संकटात लोकांच्या स्क्रिनटाईम म्हणजेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर घालवण्यात आलेला वेळ वाढता आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता सध्या कोरोनाच्या काळात त्याचा वापर हा आणखी वाढल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांच्या स्क्रिनटाईम म्हणजेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर घालवण्यात आलेला वेळ वाढता आहे. स्मार्टफनन तयार करणारी कंपनी वीवोने भारतात स्मार्टफोनचा वापर किती वेळ केला जातो याबाबत एक सर्व्हे जारी केला आहे. यामध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनच्या वापरात 25 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे. 

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि मनोरंजन आणि इतर गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. लोक आपल्या गरजेनुसार या गॅजेट्सचा वापर करतात. सीएमआरने मोबाईल कंपनी वीवोच्या वतीने हा रिसर्च केला आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनचा वापर 11 टक्क्यांनी वाढून 5.5 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. तर एप्रिलमध्ये 25 टक्के आणखी वाढून 6.9 तास प्रतिदिनवर पोहचला आहे. हाच वेळ 2019 मध्ये सरासरी 4.9 तास होता. 

स्मार्टफोन आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम - 2020 या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर भारतीय आपल्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होमसाठी स्मार्टफोनचा वापर 75 टक्क्यांनी वाढला आहे. तर कॉलिंगसाठी 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नेटफ्लिक्स, स्पॉटिफायसारख्या ओव्हर द टॉप सेवांसाठी स्मार्टफोनच्या वापरात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं

सोशल मीडियासाठी स्मार्टफोनचा वापर 55 टक्क्यांनी वाढला आहे. स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेमिंगसाठी यात 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोनचा वापर प्रतिदिन 14 मिनिटांनी वाढून 18 मिनिटांवर पोहचला आहे. या रिसर्चमध्ये आठ शहरांतील 15 ते 45 वयोगटातील जवळपास 2000 लोकांची मतं घेण्यात आली. यात 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे.

वीवो इंडियाचे संचालक निपुण मार्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कंपनीने अशाच प्रकारचा रिसर्च गेल्या वर्षीही केला होता. स्मार्टफोन हे सर्वात उत्तम माध्यम असल्याचं सर्वच जाणतात. खासकरून कोरोना काळात स्मार्टफोन अतिशय महत्त्वाचा ठरला. मात्र स्मार्टफोनच्या अति वापराचा प्रतिकूल परिणाम होतो. स्मार्टफोनचं एडिक्शन होत आहे. 84 टक्के लोकांनी ते सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पहिले 15 मिनिटं फोन बघत असल्याचं सांगितलं."

"कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल"

जवळपास 46 लोकांनी ते मित्रांसोबत एका तासाच्या बैठकीवेळी कमीत-कमी पाच वेळा आपला फोन उचलतात असं सांगितलं. कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल, काही बदल होतील. मात्र कोरोना काळात झालेले काही बदल कायम राहतील असं देखील निपुण मार्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान