शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

Apple कंपनीने १८५ तेलगू कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढले; टीका होताच..., कोणीच समर्थन करू शकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:48 IST

अ‍ॅप्पलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळविण्यासाठी करोडो लोक तरसत असतात. पण ज्यांना नोकरी मिळाली ते ती टिकवू शकत नाहीत, इमाने इतबारे करू शकत नाहीत.

जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅप्पल कंपनीने १८५ भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे कंपनीवर टीका होत होती. यावर कंपनीने या कर्मचाऱ्यांना का काढून टाकले त्याचे कारण दिले आहे. अ‍ॅप्पलने तेलगू भाषिक असलेल्या या कर्मचाऱ्यांना काढले आहे. 

तेलगू कर्मचाऱ्यांनाच नोकरीवरून काढल्याने भाषिक वाद किंवा भारतीय असल्याचा आकस आदी गोष्टींवरून कंपनीवर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे. परंतू, हा वाद नसून या कर्मचाऱ्यांनी कंपनीसोबत फ्रॉड केला आहे, तसेच कर चोरी केली आहे. या कारणामुळे अमेरिकेच्या आयकर विभागाने कंपनीला या कर्मचाऱ्यांबाबत सूचित केले होते. यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

अ‍ॅप्पल एक खास योजना राबविते, जिचे नाव Apple Matching Gifts Program असे आहे. याचा या तेलगू कर्मचाऱ्यांनी गैरवापर केला होता. अमेरिकेच्या आयएरएसने याचा भांडाफोड केला आहे. तेलगू भाषिक लोकांनी एकमेकांना सांगून याचा गैरफायदा उठविला होता. यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे. 

काही कर्मचारी अनियमितता करून अ‍ॅप्पलच्या गिफ्ट प्रोग्रॅमचा लाभ उठवत असल्याचा संशय अ‍ॅप्पलच्या फायनान्स विभागाला आला होता. त्यांनी आयआरएसला याबाबत कळविले होते. यात आयआरएसने १८५ कर्मचाऱ्यांचे आयकर रिटर्न तपासले तर यात गडबड केल्याचे समोर आले. या १८५ तेलगू कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांपासून एंट्री लेव्हल एक्झिक्युटिव्हपर्यंत सर्वांचा समावेश होता. 

टॅग्स :Apple IncअॅपलAmericaअमेरिका