शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:16 IST

फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत.

आपल्या हातातील छोटंसं यंत्र अर्थात मोबाईल फोन, याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. मोबाईल हा दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एखादा दिवस जर फोन बिघडला तर अवघं जग थांबल्यासारखं वाटतं. पण, फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्या व्यक्तीलासुद्धा कदाचित फोन रिस्टार्ट करण्याचे फायदे माहिती नसतील. पण, फोनच्या परफॉर्मन्सपासून ते त्याच्या बॅटरी लाईफपर्यंत अनेक गोष्टींसाठी फोन रिस्टार्ट करणे फायद्याचे आहे. ज्याप्रमाणे माणसाला रोजच्या कामातून एका ब्रेकची गरज असते, त्याचप्रमाणे फोनला देखील रिस्टार्ट ब्रेकची गरज असते. 

स्पीड आणि परफॉर्मन्स होतो बूस्ट 

मोबाईल फोन रीस्टार्ट करण्याचा मोठा फायदा असा आहे की, यामुळे रॅम क्लिअर होतो. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट केला की त्याच्या रॅमवर साठून राहिलेल्या कॅश फाइल्स काढून टाकल्या जातात. तुम्ही एखादे अॅप बंद केले तरीही ते बॅकग्राउंडमध्ये चालू राहू शकते, ज्यामुळे रॅम भरतो आणि फोनचा वेग कमी होतो. अशावेळी जर तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट केला, तर रॅम बॅकग्राऊंड अॅप बंद करतो, ज्यामुळे तुमच्या फोनचा वेग आणि कार्यक्षमता वाढते.

कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्या दूर होतात

जर तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत असतील, तर तुमचा फोन रिस्टार्ट केल्याने बऱ्याचदा या समस्या सुटू शकतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केला आहे, पण तरीही इंटरनेट काम करत नाही. बऱ्याच लोकांना वाटेल की, ही समस्या वाय-फायमध्ये आहे, परंतु कधीकधी दुसऱ्या फोनच्या हॉटस्पॉटशी कनेक्ट केल्यानेही इंटरनेट बिघाड होऊ शकतो. मात्र, फोन रिस्टार्ट करून अशा कनेक्टिव्हिटी समस्या सोडवता येतात.

मोबाईल फोन हँग होण्याची समस्या दूर होते

जर, तुमचा फोन जास्त हँग होत असेल, तर तुम्ही त्याला एकदा तरी रिस्टार्ट करून बघायला हवे. यामुळे समस्या तात्पुरती कमी होऊ शकते. पण, जर तुमचा फोन वारंवार हँग होत असेल, तर त्याचे नेमके कारण शोधून समस्येचे निराकरण करायला हवे. एकंदरीत, फोन रिस्टार्ट केल्याने मेमरी रिफ्रेश होण्यास, अॅप एरर दुरुस्त होण्यास आणि किरकोळ सिस्टम ग्लिच दूर करण्यास मदत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unlock Your Phone's Potential: Restart for Speed, Connectivity, and More!

Web Summary : Restarting your phone boosts speed by clearing RAM and resolving connectivity issues. It can also fix occasional freezing. Regular restarts enhance overall performance and battery life, similar to a break for humans.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान