शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:16 IST

फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत.

आपल्या हातातील छोटंसं यंत्र अर्थात मोबाईल फोन, याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. मोबाईल हा दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एखादा दिवस जर फोन बिघडला तर अवघं जग थांबल्यासारखं वाटतं. पण, फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्या व्यक्तीलासुद्धा कदाचित फोन रिस्टार्ट करण्याचे फायदे माहिती नसतील. पण, फोनच्या परफॉर्मन्सपासून ते त्याच्या बॅटरी लाईफपर्यंत अनेक गोष्टींसाठी फोन रिस्टार्ट करणे फायद्याचे आहे. ज्याप्रमाणे माणसाला रोजच्या कामातून एका ब्रेकची गरज असते, त्याचप्रमाणे फोनला देखील रिस्टार्ट ब्रेकची गरज असते. 

स्पीड आणि परफॉर्मन्स होतो बूस्ट 

मोबाईल फोन रीस्टार्ट करण्याचा मोठा फायदा असा आहे की, यामुळे रॅम क्लिअर होतो. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट केला की त्याच्या रॅमवर साठून राहिलेल्या कॅश फाइल्स काढून टाकल्या जातात. तुम्ही एखादे अॅप बंद केले तरीही ते बॅकग्राउंडमध्ये चालू राहू शकते, ज्यामुळे रॅम भरतो आणि फोनचा वेग कमी होतो. अशावेळी जर तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट केला, तर रॅम बॅकग्राऊंड अॅप बंद करतो, ज्यामुळे तुमच्या फोनचा वेग आणि कार्यक्षमता वाढते.

कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्या दूर होतात

जर तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत असतील, तर तुमचा फोन रिस्टार्ट केल्याने बऱ्याचदा या समस्या सुटू शकतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केला आहे, पण तरीही इंटरनेट काम करत नाही. बऱ्याच लोकांना वाटेल की, ही समस्या वाय-फायमध्ये आहे, परंतु कधीकधी दुसऱ्या फोनच्या हॉटस्पॉटशी कनेक्ट केल्यानेही इंटरनेट बिघाड होऊ शकतो. मात्र, फोन रिस्टार्ट करून अशा कनेक्टिव्हिटी समस्या सोडवता येतात.

मोबाईल फोन हँग होण्याची समस्या दूर होते

जर, तुमचा फोन जास्त हँग होत असेल, तर तुम्ही त्याला एकदा तरी रिस्टार्ट करून बघायला हवे. यामुळे समस्या तात्पुरती कमी होऊ शकते. पण, जर तुमचा फोन वारंवार हँग होत असेल, तर त्याचे नेमके कारण शोधून समस्येचे निराकरण करायला हवे. एकंदरीत, फोन रिस्टार्ट केल्याने मेमरी रिफ्रेश होण्यास, अॅप एरर दुरुस्त होण्यास आणि किरकोळ सिस्टम ग्लिच दूर करण्यास मदत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unlock Your Phone's Potential: Restart for Speed, Connectivity, and More!

Web Summary : Restarting your phone boosts speed by clearing RAM and resolving connectivity issues. It can also fix occasional freezing. Regular restarts enhance overall performance and battery life, similar to a break for humans.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान