शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:14 IST

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे.

सुरुवातीला १००-१५० रुपयांत २८ दिवसांचे रिचार्ज देणाऱ्या एअरटेल, रिलायन्स जिओसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी हीच रिचार्ज आता २००-२५० पार नेऊन ठेवली आहेत. दिवसेंदिवस मोबाईल रिचार्ज महाग होत चालली आहेत. तसेच आता कंपन्यांनी दर महिन्याला रिचार्ज मारणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी पैसे मोजावेच लागत आहेत. 

असे असताना ट्रायने यावर दिलासा देण्यासाठी अनोखा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवला आहे. ईटीच्या वृत्तानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायने ड्युअल सिम ठेवणाऱ्यांना फक्त इनकमिंग आणि एसएमएससाठी प्लॅन लाँच करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. या प्लॅनमध्ये फक्त इनकमिंग कॉल येणार आहेत, तसेच एसएमएस पाठविता येणार आहेत. यामुळे पहिल्या सिमसोबत दुसरे देखील सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठीचा जो भूर्दंड आहे तो वाचणार आहे. 

हा प्लॅन ज्या लोकांचा जास्त  वापर नाहीय त्यांच्यासाठी देखील चांगला राहणार आहे. तसेच दुसरे सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी देखील फायद्याचा असणार असून रिचार्जचे दर निम्म्याने कमी होणार आहेत. 

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत, कमी किमतीत इनकमिंग कॉल्स आणि फक्त एसएमएस योजनांची कल्पना सरकारने दूरसंचार कंपन्यांसमोर मांडली आहे. यामुळे नवीन युजरदेखील जोडले जातील. इनकमिंग कॉलिंग आणि एसएमएस पॅकची किंमत नियमित प्लॅनच्या निम्म्याहून कमी असू शकते.

Jio, Airtel आणि Vodafone-Idea सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या म्हणण्यानुसार असे प्लॅन ARPU वाढविण्यास मदतगार नाहीत. यामध्ये इनकमिंग किंवा आउटगोइंग नेटवर्क अशा दोन्हीचा वापर होईल. यामुळे कमाई कमी होईल आणि आमचे नुकसान होईल.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)