शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:14 IST

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे.

सुरुवातीला १००-१५० रुपयांत २८ दिवसांचे रिचार्ज देणाऱ्या एअरटेल, रिलायन्स जिओसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी हीच रिचार्ज आता २००-२५० पार नेऊन ठेवली आहेत. दिवसेंदिवस मोबाईल रिचार्ज महाग होत चालली आहेत. तसेच आता कंपन्यांनी दर महिन्याला रिचार्ज मारणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी पैसे मोजावेच लागत आहेत. 

असे असताना ट्रायने यावर दिलासा देण्यासाठी अनोखा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवला आहे. ईटीच्या वृत्तानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायने ड्युअल सिम ठेवणाऱ्यांना फक्त इनकमिंग आणि एसएमएससाठी प्लॅन लाँच करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. या प्लॅनमध्ये फक्त इनकमिंग कॉल येणार आहेत, तसेच एसएमएस पाठविता येणार आहेत. यामुळे पहिल्या सिमसोबत दुसरे देखील सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठीचा जो भूर्दंड आहे तो वाचणार आहे. 

हा प्लॅन ज्या लोकांचा जास्त  वापर नाहीय त्यांच्यासाठी देखील चांगला राहणार आहे. तसेच दुसरे सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी देखील फायद्याचा असणार असून रिचार्जचे दर निम्म्याने कमी होणार आहेत. 

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत, कमी किमतीत इनकमिंग कॉल्स आणि फक्त एसएमएस योजनांची कल्पना सरकारने दूरसंचार कंपन्यांसमोर मांडली आहे. यामुळे नवीन युजरदेखील जोडले जातील. इनकमिंग कॉलिंग आणि एसएमएस पॅकची किंमत नियमित प्लॅनच्या निम्म्याहून कमी असू शकते.

Jio, Airtel आणि Vodafone-Idea सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या म्हणण्यानुसार असे प्लॅन ARPU वाढविण्यास मदतगार नाहीत. यामध्ये इनकमिंग किंवा आउटगोइंग नेटवर्क अशा दोन्हीचा वापर होईल. यामुळे कमाई कमी होईल आणि आमचे नुकसान होईल.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)