शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:14 IST

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे.

सुरुवातीला १००-१५० रुपयांत २८ दिवसांचे रिचार्ज देणाऱ्या एअरटेल, रिलायन्स जिओसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी हीच रिचार्ज आता २००-२५० पार नेऊन ठेवली आहेत. दिवसेंदिवस मोबाईल रिचार्ज महाग होत चालली आहेत. तसेच आता कंपन्यांनी दर महिन्याला रिचार्ज मारणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी पैसे मोजावेच लागत आहेत. 

असे असताना ट्रायने यावर दिलासा देण्यासाठी अनोखा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवला आहे. ईटीच्या वृत्तानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायने ड्युअल सिम ठेवणाऱ्यांना फक्त इनकमिंग आणि एसएमएससाठी प्लॅन लाँच करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. या प्लॅनमध्ये फक्त इनकमिंग कॉल येणार आहेत, तसेच एसएमएस पाठविता येणार आहेत. यामुळे पहिल्या सिमसोबत दुसरे देखील सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठीचा जो भूर्दंड आहे तो वाचणार आहे. 

हा प्लॅन ज्या लोकांचा जास्त  वापर नाहीय त्यांच्यासाठी देखील चांगला राहणार आहे. तसेच दुसरे सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी देखील फायद्याचा असणार असून रिचार्जचे दर निम्म्याने कमी होणार आहेत. 

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत, कमी किमतीत इनकमिंग कॉल्स आणि फक्त एसएमएस योजनांची कल्पना सरकारने दूरसंचार कंपन्यांसमोर मांडली आहे. यामुळे नवीन युजरदेखील जोडले जातील. इनकमिंग कॉलिंग आणि एसएमएस पॅकची किंमत नियमित प्लॅनच्या निम्म्याहून कमी असू शकते.

Jio, Airtel आणि Vodafone-Idea सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या म्हणण्यानुसार असे प्लॅन ARPU वाढविण्यास मदतगार नाहीत. यामध्ये इनकमिंग किंवा आउटगोइंग नेटवर्क अशा दोन्हीचा वापर होईल. यामुळे कमाई कमी होईल आणि आमचे नुकसान होईल.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)