शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

Airtel घेणार TCS ची मदत; देशात ‘Made In india’ 5G आणण्यासाठी केली भागेदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:54 IST

Airtel joins hand with TCS: देशात ‘मेड इन इंडिया’ 5G आणण्यासाठी एयरटेलने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सोबत भागेदारी केली आहे.  

भारतात 5जी नेटवर्क आणण्याची शर्यत सुरु झाली आहे, यात भारती एयरटेल आणि रिलायन्स जियो आघाडीवर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एयरटेलने गुरुग्राममध्ये ट्रायल सुरु केले होते त्यातून 1Gbps चा स्पीड मिळाला होता. आता जियोला मागे टाकण्यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत भागेदारी केली आहे. यामुळे एयरटेलला देखील जियोप्रमाणे ‘मेड इन इंडिया’ 5G नेटवर्क ग्राहकांना देता येईल.  

टाटा ग्रुपने एक ‘अत्याधुनिक’ ओ-आरएएन आधारित रेडियो आणि एनएसए/एसए कोर बनवला आहे आणि आपल्या पार्टनर्सच्या मदतीने या पूर्णपणे स्वदेशी दूरसंचार स्टॅकची जोडणी केली आहे. हि टेक्नॉलॉजी जानेवारी 2022 पासून व्यवसायिकरित्या वापरण्यासाठी उपलब्ध होईल. 

भारती एयरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टलचा यांनी म्हटले, ‘5जी आणि त्या संबंधित टेक्नॉलॉजीसाठी भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी आम्ही टाटा समूहासोबत मिळून काम करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी इकोसिस्टम आणि कौशल्याच्या जोरावर भारत जगाला मॉर्डन सोल्यूशन आणि अ‍ॅप्लीकेशन देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यामुळे भारताला इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग डिस्टिनेशन बनण्यास मोठ्याप्रमाणावर मदत होईल.’  

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेज (TCS) आपल्या ग्लोबल सिस्टम इंटिग्रेशन मधील अनुभवासह 3GPP आणि O-RAN दोन्ही स्टँडर्ड्ससाठी एन्ड -टू-एन्ड सोल्युशन देण्यास मदत करते, कारण नेटवर्क आणि उपकरण वेगाने सॉफ्टवेयरमध्ये एम्बेड होतात. एयरटेल भारतात आपल्या 5G रोलआउटबाबत उत्साहित आहे आणि 2022 जानेवारीपर्यंत स्वदेशी 5G भारतात रोलआउट केले जाईल, अशी चर्चा आहे. एयरटेल भारत सरकारच्या नियमावलीचे पालन करत भारतात 5G रोलआउट करेल. 

टॅग्स :Airtelएअरटेल