शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 07:38 IST

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात भारताने अमेरिका व ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकून आघाडी घेतली आहे, असा दावा वृत्तसंस्था ‘एएनआय’ने केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात केला आहे.

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत, सिंगापूर, ब्रिटन, आणि अमेरिका हे देश एआय स्वीकारण्याच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत. याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारखे देश तांत्रिक प्रगतीत मागे पडले आहेत.

जगात एआय तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशातील ६७ टक्के कंपन्यांकडे हायब्रीड आयटी वातावरण आहे. भारतात हे प्रमाण सर्वाधिक ७० टक्के, तर जपानमध्ये सर्वांत कमी २४ टक्के आहे.

६०% कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू

या सर्वेक्षणात जगातील प्रमुख १० देशांतील १,३०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले होते.

अहवालानुसार, भारत, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या देशांतील ६० टक्के कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू आहेत अथवा पथदर्शक टप्प्यात आहेत.

याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जर्मनी आणि जपान या देशांतील केवळ ३६ टक्के कंपन्यांनी एआयसाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स