शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 07:38 IST

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात भारताने अमेरिका व ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकून आघाडी घेतली आहे, असा दावा वृत्तसंस्था ‘एएनआय’ने केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात केला आहे.

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत, सिंगापूर, ब्रिटन, आणि अमेरिका हे देश एआय स्वीकारण्याच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत. याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारखे देश तांत्रिक प्रगतीत मागे पडले आहेत.

जगात एआय तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशातील ६७ टक्के कंपन्यांकडे हायब्रीड आयटी वातावरण आहे. भारतात हे प्रमाण सर्वाधिक ७० टक्के, तर जपानमध्ये सर्वांत कमी २४ टक्के आहे.

६०% कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू

या सर्वेक्षणात जगातील प्रमुख १० देशांतील १,३०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले होते.

अहवालानुसार, भारत, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या देशांतील ६० टक्के कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू आहेत अथवा पथदर्शक टप्प्यात आहेत.

याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जर्मनी आणि जपान या देशांतील केवळ ३६ टक्के कंपन्यांनी एआयसाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स