शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

5G साठी 6 पट अधिक टॉवर, केबल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ जी सेवेच्या तुलनेत ६ पट अधिक दूरसंचार टॉवर आणि फायबर-ऑप्टिक केबल लागतील, असे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन दीपक छाबरिया यांनी म्हटले आहे.

‘फिनोलेक्स केबल्स’ ही  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. छाबरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ५ जी दूरसंचार सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची असेल, तर आताच्यापेक्षा ६ पट अधिक पायाभूत सुविधांची गरज लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार टॉवरपैकी केवळ ३० टक्के टाॅवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. उरलेले टॉवर ४ जी सेवेसाठी सूक्ष्म लहरींवर चालतात. मात्र ५ जी सेवेसाठी प्रत्येक टॉवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेला असणे आवश्यक आहे. टॉवरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. 

छाबरिया यांनी सांगितले की, ४ जी सेवा ज्या सूक्ष्म लहरींवर चालते, त्या लहरी अखंडित ५ जी सेवेसाठी विश्वसनीय नाहीत. विशेषत: वातावरणीय बदलांत या लहरी टिकत नाहीत. शहरांमध्ये फायबर केबलने जाेडलेल्या टॉवरचा रिंग रोड लागेल. यातील आणखी एक आव्हान असे की, प्रत्येक इंटरसेक्शनसाठी वेगळ्या केबल संचाची गरज लागणार आहे. आपली कंपनी हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचेही छाबरिया यांनी म्हटले आहे.

५ जीमध्ये इंटरनेट स्पीड २० जीबीपीएस४ जी सेवेच्या इंटरनेटची गती २ जीबीपीएस आहे. ५ जीमध्ये ते २० जीबीपीएस असेल. ५ जी सेवेत टॉवरचा आकार घटेल. मात्र, अखंडित सेवा देण्यासाठी टॉवरची संख्या ६ पट अधिक लागेल. ५ जी इंटरनेट सेवेमुळे चालकरहित कारच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्याचा मोठा फायदा देशाला होईल.    - दीपक छाबरिया,     कार्यकारी चेअरमन, फिनोलेक्स     केबल्स लिमिटेड