शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

5G साठी 6 पट अधिक टॉवर, केबल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ जी सेवेच्या तुलनेत ६ पट अधिक दूरसंचार टॉवर आणि फायबर-ऑप्टिक केबल लागतील, असे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन दीपक छाबरिया यांनी म्हटले आहे.

‘फिनोलेक्स केबल्स’ ही  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. छाबरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ५ जी दूरसंचार सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची असेल, तर आताच्यापेक्षा ६ पट अधिक पायाभूत सुविधांची गरज लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार टॉवरपैकी केवळ ३० टक्के टाॅवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. उरलेले टॉवर ४ जी सेवेसाठी सूक्ष्म लहरींवर चालतात. मात्र ५ जी सेवेसाठी प्रत्येक टॉवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेला असणे आवश्यक आहे. टॉवरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. 

छाबरिया यांनी सांगितले की, ४ जी सेवा ज्या सूक्ष्म लहरींवर चालते, त्या लहरी अखंडित ५ जी सेवेसाठी विश्वसनीय नाहीत. विशेषत: वातावरणीय बदलांत या लहरी टिकत नाहीत. शहरांमध्ये फायबर केबलने जाेडलेल्या टॉवरचा रिंग रोड लागेल. यातील आणखी एक आव्हान असे की, प्रत्येक इंटरसेक्शनसाठी वेगळ्या केबल संचाची गरज लागणार आहे. आपली कंपनी हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचेही छाबरिया यांनी म्हटले आहे.

५ जीमध्ये इंटरनेट स्पीड २० जीबीपीएस४ जी सेवेच्या इंटरनेटची गती २ जीबीपीएस आहे. ५ जीमध्ये ते २० जीबीपीएस असेल. ५ जी सेवेत टॉवरचा आकार घटेल. मात्र, अखंडित सेवा देण्यासाठी टॉवरची संख्या ६ पट अधिक लागेल. ५ जी इंटरनेट सेवेमुळे चालकरहित कारच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्याचा मोठा फायदा देशाला होईल.    - दीपक छाबरिया,     कार्यकारी चेअरमन, फिनोलेक्स     केबल्स लिमिटेड