शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

5G साठी 6 पट अधिक टॉवर, केबल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ जी सेवेच्या तुलनेत ६ पट अधिक दूरसंचार टॉवर आणि फायबर-ऑप्टिक केबल लागतील, असे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन दीपक छाबरिया यांनी म्हटले आहे.

‘फिनोलेक्स केबल्स’ ही  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. छाबरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ५ जी दूरसंचार सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची असेल, तर आताच्यापेक्षा ६ पट अधिक पायाभूत सुविधांची गरज लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार टॉवरपैकी केवळ ३० टक्के टाॅवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. उरलेले टॉवर ४ जी सेवेसाठी सूक्ष्म लहरींवर चालतात. मात्र ५ जी सेवेसाठी प्रत्येक टॉवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेला असणे आवश्यक आहे. टॉवरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. 

छाबरिया यांनी सांगितले की, ४ जी सेवा ज्या सूक्ष्म लहरींवर चालते, त्या लहरी अखंडित ५ जी सेवेसाठी विश्वसनीय नाहीत. विशेषत: वातावरणीय बदलांत या लहरी टिकत नाहीत. शहरांमध्ये फायबर केबलने जाेडलेल्या टॉवरचा रिंग रोड लागेल. यातील आणखी एक आव्हान असे की, प्रत्येक इंटरसेक्शनसाठी वेगळ्या केबल संचाची गरज लागणार आहे. आपली कंपनी हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचेही छाबरिया यांनी म्हटले आहे.

५ जीमध्ये इंटरनेट स्पीड २० जीबीपीएस४ जी सेवेच्या इंटरनेटची गती २ जीबीपीएस आहे. ५ जीमध्ये ते २० जीबीपीएस असेल. ५ जी सेवेत टॉवरचा आकार घटेल. मात्र, अखंडित सेवा देण्यासाठी टॉवरची संख्या ६ पट अधिक लागेल. ५ जी इंटरनेट सेवेमुळे चालकरहित कारच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्याचा मोठा फायदा देशाला होईल.    - दीपक छाबरिया,     कार्यकारी चेअरमन, फिनोलेक्स     केबल्स लिमिटेड