शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोबाइलला १.२८ कोटी ग्राहकांचा रामराम; जिओला बसला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:56 IST

ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत.

मुंबई : तंत्रकौशल्यात भारत एकीकडे उंच भरारी घेत असताना, डिसेंबर महिन्यात मात्र देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांत १.२८ कोटींची घट नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मधील मोबाइल वापरकर्त्यांची तुलनात्मक आकडेवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकतीच सादर केली. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. जिओने गमावले सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. 

बीएसएनएल, एअरटेलची चांदी

अन्य दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक कमी झाले असले तरी एअरटेल आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये एअरटेलने चार लाख ७५ हजार नवे ग्राहक जोडले. त्यामुळे त्यांची एकूण ग्राहकसंख्या ३६.५७ कोटींवर पोहोचली आहे. बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येतही या महिन्यात ४७ हजारांची भर पडली.

कारणे काय?सर्वच खासगी दूरसंचार कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये रिचार्जचे दर जवळपास १८ ते २५ टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे ग्राहकांनी किफायतशीर सेवाप्रदाता शोधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सेवेचा दर्जा टिकवण्यात काही दूरसंचार कंपन्यांची पीछेहाट झाल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. मुंबईसारख्या महानगरातही ग्राहकांना नेटवर्कशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने त्यांनी अन्य पर्याय शोधला.

टॅग्स :Mobileमोबाइल