शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार; वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून मुक्ती !

By appasaheb.patil | Updated: August 19, 2022 15:56 IST

महावितरण कंपनी सोलापुरात बसविणार स्मार्ट मीटर

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहे. मोबाइल सीम कार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागणार आहे. याबाबतच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली असून, प्रारंभी मुंबई, पुणे व अन्य मेट्रोसिटीत हे मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्रीपेड मीटर अगदी मोबाइलच्या सीमकार्डसारखे काम करते. जसे आपल्याला महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो. त्यानंतर ठरावीक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्ज सुरू राहते. त्यानंतर संपते, तसेच वीज बिल प्रीपेड मीटरबाबत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरला आधी रिचार्ज करावे लागेल, त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहणार आहे.

---------

स्मार्ट वीज मीटरचे फायदे

  • - मोबाइलच्या सीमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.
  • - वीज वापरानुसारच बिल येईल, तसेच प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.
  • - स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल.
  • - स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाण-घेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीत कमी वेळेत करता येईल.

--------

महावितरणचे आर्थिक गणित सुधारणार

सध्या वीज मीटरचे बिल दर महिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडविण्यासाठी आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, अशी आशा महावितरणने व्यक्त केली आहे.

-------

जानेवारीनंतर सोलापुरात बसविणार स्मार्ट मीटर

सध्या स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल. सप्टेंबर महिन्यात मुंबई, पुणे व अन्य शहरांत स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास प्रारंभ होईल. सुरुवातील घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.

---------

सोलापूर जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांची संख्या - ६ लाख ४६ हजार ९२३

-------

सुरुवातील घरगुती मीटर बदलणार

स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात सुरू होणार असल्याचे संकेत महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिले. सुरुवातीला घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येतील, त्यानंतर औद्योगिक वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. वाणिज्यिक, कृषी व अन्य ग्राहकांबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही.

 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणSmart Cityस्मार्ट सिटी