शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:13 IST

सिद्धवचन - दुःख

अपत्याच्या दुःखे | कष्टी बाप - माय |

इतरांस काय | दुःख त्याचे ? || २४९.६ ||(अभंगगाथा)

  आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार असतो. दुसऱ्याने सदाचार केला. त्याचे मोक्षरूपी फल आपल्याला मिळणार आहे काय ? दुसऱ्याच्या दुराचारामुळे आपण भवपाशात ढकलले जाणार आहोत काय ? हे देवा, आमचे लक्ष लिंगावर असते. तुझे लक्ष आमच्यावर असते. माझे हे शब्द खोटे ठरवू नकोस. मुलांचे दुःख पाहून त्याच्या आई-वडिलांनाच दुःख होते. इतरांना दुःख होत नाही. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, आमचे दुःख तुझेच दुःख होय.

परमेश्वराची सेवा, चिंतन, नामस्मरण, भक्ती मनापासून केली की आपल्याला तो निश्चिंत करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी ' घालूनियां भार राहिलों निश्चिंतीं || ३४५५.१ || असे म्हटले आहे. आपली सगळी चिंता त्याला असते. याचे ज्ञान ज्याला नाही तो चिंता करीत बसतो. याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो निश्चिंत असतो. लक्ष्मण महाराज म्हणतात, ' दुःख निवारी शंकर | करा वश गंगाधर || १४४९.१ || शंकराला वश करण्यासाठी भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.

शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे ; हे मल्लय्या तुझे लक्ष आमच्यावर असते. मल्लय्याचे लक्ष आपल्याकडे राहावे यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केलेले चिंतन, भक्ती आपल्यालाही करावी लागेल.

मल्लय्याची सेवा | करुया मनाने |

दुःख जाते त्याने | निश्चितच || १ ||

आपलेही दुःख | घेतो शिरावरी |

करू भक्ती खरी | तेव्हाच हो || २ ||

सिद्धदास म्हणे | करू आता भक्ती |

मग मिळे शक्ती | सर्वार्थाने || ३ ||

- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक