शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:13 IST

सिद्धवचन - दुःख

अपत्याच्या दुःखे | कष्टी बाप - माय |

इतरांस काय | दुःख त्याचे ? || २४९.६ ||(अभंगगाथा)

  आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार असतो. दुसऱ्याने सदाचार केला. त्याचे मोक्षरूपी फल आपल्याला मिळणार आहे काय ? दुसऱ्याच्या दुराचारामुळे आपण भवपाशात ढकलले जाणार आहोत काय ? हे देवा, आमचे लक्ष लिंगावर असते. तुझे लक्ष आमच्यावर असते. माझे हे शब्द खोटे ठरवू नकोस. मुलांचे दुःख पाहून त्याच्या आई-वडिलांनाच दुःख होते. इतरांना दुःख होत नाही. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, आमचे दुःख तुझेच दुःख होय.

परमेश्वराची सेवा, चिंतन, नामस्मरण, भक्ती मनापासून केली की आपल्याला तो निश्चिंत करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी ' घालूनियां भार राहिलों निश्चिंतीं || ३४५५.१ || असे म्हटले आहे. आपली सगळी चिंता त्याला असते. याचे ज्ञान ज्याला नाही तो चिंता करीत बसतो. याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो निश्चिंत असतो. लक्ष्मण महाराज म्हणतात, ' दुःख निवारी शंकर | करा वश गंगाधर || १४४९.१ || शंकराला वश करण्यासाठी भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.

शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे ; हे मल्लय्या तुझे लक्ष आमच्यावर असते. मल्लय्याचे लक्ष आपल्याकडे राहावे यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केलेले चिंतन, भक्ती आपल्यालाही करावी लागेल.

मल्लय्याची सेवा | करुया मनाने |

दुःख जाते त्याने | निश्चितच || १ ||

आपलेही दुःख | घेतो शिरावरी |

करू भक्ती खरी | तेव्हाच हो || २ ||

सिद्धदास म्हणे | करू आता भक्ती |

मग मिळे शक्ती | सर्वार्थाने || ३ ||

- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक