शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

World Telecommunication Day; तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेद्वारे कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:38 IST

जागतिक दूरसंचार दिन : शहरात ३ किमी आॅप्टिकल फायबर टाकून आधुनिकतेचे पाऊल टाकले

ठळक मुद्देमागील दोन वर्षांत शहरातील ३ किलोमीटर अंतरावर तांब्याच्या तारेची वायरिंग काढून त्या ठिकाणी आधुनिक फायबर आॅप्टिकल लाईन टाकली तीन वर्षांत जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडून आधुनिक तेचे पाऊल टाकले आहे.

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : विविध घटकांना जोडून ठेवणाºया दूरसंचार खात्याने सोलापुरात कात टाकायला सुरूवात केली आहे. मागील दोन वर्षांत शहरातील ३ किलोमीटर अंतरावर तांब्याच्या तारेची वायरिंग काढून त्या ठिकाणी आधुनिक फायबर आॅप्टिकल लाईन टाकली आहे़ तसेच तीन वर्षांत जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडून आधुनिक तेचे पाऊल टाकले आहे.

१७ मे : जागतिक दूरसंचार दिन म्हणून पाळला जात आहे़ यानिमित्त बीएसएनएलचा जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता सोलापूर कार्यालयाने कात टाकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे़ ग्रामीण भागात बीएसएनएल ते ग्रामपंचायतपर्यंत फायबर आॅिप्टकल टाकायला सुरुवात करण्यात आली आहे़ जुनी तांबे धातू असलेली लाईन काढण्याचे काम सुरू असून, याबरोबर आॅप्टिकल लाईन टाकली जात आहे़ यामुळे एफटीटीएसची जोडणी वाढणार असून, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ नागरिकांच्या प्रश्नांवर तक्रार नोंदवण्यासाठी १९५ आणि १९८ हे दोन हेल्पलाईन नंबर दिले आहेत़ ग्रामीण भागात ज्या ठिकाणी टू जी आहे त्या ठिकाणी भारत संचार निगमने १४७ ठिकाणी अल्का टेलची यंत्रणा वापरून सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेषत: सोलापूर शहराबरोबर बार्शी, पंढरपूर येथेही तांब्याची वायर काढून त्या ठिकाणी फायबर आॅप्टिकल वायर टाकण्याचे काम हाती घेतले आहे़ लँडलाईनची व्यवस्था टिकून राहावी म्हणून न्यू जनरेशन नेटवर्क (एऩजी़एऩ) ही मोहीम हाती घेतली आहे़ जिल्ह्यात ९ तालुक्यांच्या ठिकाणी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे़ नव्या टेक्नॉलॉजीचा वापर यात वाढवला गेला आहे़ ही सारी विकासकामे पाहता जग मुठीत आणण्याचे आणि दोन माणसांमधील संवाद वाढवण्याचे काम दूरसंचारकडून होत आहे.

९५ ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट- जिल्ह्यात काही खेड्यांमध्ये मोबाईल रेंज पोहोचत नाही़ अशाही ठिकाणच्या शेतकरी आणि नव्या पिढीतील अंतर कमी करण्यासाठी, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी बीएसएनएलने सरल वायफाय हॉटस्पॉट सुरू केली आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक खेड्यात ८५ ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट लावले गेले आहेत़ यापूर्वी आणखी ७५ वायफाय हॉटस्पॉट लावले गेले आहेत़ आता जिल्ह्यात वायफाय हॉटस्पॉटची संख्या ही १७० झाली आहे़ या वायफाय हॉटस्पॉटमुळे ज्या भागात रेंज नाही त्या भागात जवळपास १०० मीटरपर्यंत कव्हरेज मिळते़ 

गेल्या तीन वर्षांत बीएसएनएलने अनेक कामे हाती घेतली आहेत़ सर्वसामान्यांसाठी पेज आठनुसार नवे मोबाईल प्रोजेक्ट आणले जात आहेत़ त्याची ७० टक्के पूर्तता झाली आहे़ मोबाईलच्या रेंजबाबत नवे ८५ टॉवर उभारले गेले आहेत़ त्यामुळे मोबाईलची स्पष्टता वाढण्यास मदत झाली आहे़ याबरोबरच प्रत्येक वर्षी ४ हजार नवे धारक (जोडणी) करण्याचे उद्दिष्ट दिले गेले आहे़ बी़ जे़ उंबरजे- उपमहाप्रबंधक, बीएसएनएल

टॅग्स :SolapurसोलापूरInternetइंटरनेटSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद