शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

टोप्यांची दुनिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:49 IST

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीचा कानोसा...

रविंद्र देशमुख

नवीपेठ अन् टिळक चौकातील टोप्यांच्या दुकानात वर्दळ वाढायला लागलीय. सध्या उन्हाळा नाही अन् पावसाळाही परतायला लागलाय. पक्षपंधरवडा जाण्याच्या मार्गावर असला तरी तोंडावर नवरात्र आहे. त्यामुळे लगीन सराई तर नाहीच नाही. मग टोप्यांच्या दुकानात कुठून आलीय गर्दी?.. आता आम्ही पक्के सोलापुरी. आमचं डोकं फास्ट चालतंय. टोप्यांच्या दुकानातली गर्दी कशामुळे? हे न ओळखायला आम्ही काय येडं बिडं आहोत काय? इलेक्शन आहे ना! कार्यकर्ते, नेते येत असतील टोप्या घ्यायला! आम्ही बरोब्बर ओळखलं.

दुकानातल्या हालचाली समजून घ्यायला थेट आत गेलो.. नमस्कार ओ मालक. काय सध्या तुमची जोरदार चलती सुरू हाय. महाळाच्या महिन्यातबी जोरदार धंदा करालावं.. मालक म्हणाले, व्हय व्हय. निवडणुका आल्यात ना! कार्यकर्ते यायलेत टोप्या घ्यायला. कार्यकर्ते ढीगभर टोप्या घेऊन निघून गेले. मालकाने पैसे मोजून गल्ल्यात ठेवले. आता काउंटर रिकामं झालं होतं. मालकाशी बोलणं टाळून आम्ही शोकेसमधल्या टोप्यांचं निरीक्षण करू लागलो.. भगव्या, पांढºया, निळ्या, पिवळ्या टोप्यांनी शोकेस पुरतं भरून गेलं होतं...पांढºया टोपीचा चेहरा कसनुसा झाला होता. चेहºयावर बारा वाजले होते. भगवी मात्र पुरती खुश होती.. चेहरा खुलला होता. निळ्या, पिव्ळ्या अन् इतर रंगांच्या टोप्या आपापल्या जागेवर शांत बसून होत्या... पांढºया टोपीची उदासी पाहून आम्हालाच राहवलं नाही. सरळ मालकालाच विचारायचं ठरवलं.. मालक, ओ मालकऽऽऽ या पांढरीला काय झालंय? नेहमी तर खुलली असतीय अन् आताच काय झालं एकदम?... मालक काही बोलण्याच्या आतच पांढरी टोपी बोलू लागली.. आण्णा, काय सांगू तुम्हाला? गेली सत्तर वर्षे माझं पुढारी अन् कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अढळ स्थान व्हतं. पण या भगव्या टोपीनं माझी जागा छिनली.. आता काउंटरवर आलेले गिराईक माझ्याकडं बघ नं बी झालेत... इलेक्शनच्या काळात कुठं नको, कुठं जाऊ, अशी माझी अवस्था व्हायची, आता टोपी डोक्यावरच काय? हातात घ्यायला बी कोण तयार नाय... सर्व त्या भगवीची मागणी करू लागलेत. बघा.. बघा, कशी आकडायला लागलीय ती. मलाही त्या पांढºया टोपीची स्थिती पाहून वाईट वाटलं.. काय करणार बिच्चारी?

इलेक्शनच्या       तोंडावर ते हातवाले, घड्याळवाले नेते-पुढारी अन् कार्यकर्ते कमळवाल्यांच्या पक्षात गेल्यानं पांढºया टोपीची हीच गत व्हायची. पांढरीचं मी सांत्वन करू लागलो.. बये, काळाचा महिमा हा!.. आजकाल  तत्त्वाचं राजकारण कुठं चाललंय?.. राजकारण हा आता व्यवसाय झालायं. ‘जिकडं खोबरं, तिकडं चांगभलं’ म्हणण्याचा जमाना आहे.. पण काळजी  करू नको. निष्ठावंत अजूनही आहेत. बघितलंय परवा, ते घड्याळवाल्यांचे जुने जाणते नेते इथं आले होते. गर्दी होती की त्यांच्याभोवती!.. मग असे निष्ठावंत, पर्यायचं नाही म्हणून बनलेले काही निष्ठावंत येतील की, तुला न्यायला!.. त्यामुळे   अशी हारून बसू नको... आता भगव्या टोपीचे दिवस आहेत. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार कर अन् निवडणुकीला सामोरं जा !

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर