शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

टोप्यांची दुनिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:49 IST

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीचा कानोसा...

रविंद्र देशमुख

नवीपेठ अन् टिळक चौकातील टोप्यांच्या दुकानात वर्दळ वाढायला लागलीय. सध्या उन्हाळा नाही अन् पावसाळाही परतायला लागलाय. पक्षपंधरवडा जाण्याच्या मार्गावर असला तरी तोंडावर नवरात्र आहे. त्यामुळे लगीन सराई तर नाहीच नाही. मग टोप्यांच्या दुकानात कुठून आलीय गर्दी?.. आता आम्ही पक्के सोलापुरी. आमचं डोकं फास्ट चालतंय. टोप्यांच्या दुकानातली गर्दी कशामुळे? हे न ओळखायला आम्ही काय येडं बिडं आहोत काय? इलेक्शन आहे ना! कार्यकर्ते, नेते येत असतील टोप्या घ्यायला! आम्ही बरोब्बर ओळखलं.

दुकानातल्या हालचाली समजून घ्यायला थेट आत गेलो.. नमस्कार ओ मालक. काय सध्या तुमची जोरदार चलती सुरू हाय. महाळाच्या महिन्यातबी जोरदार धंदा करालावं.. मालक म्हणाले, व्हय व्हय. निवडणुका आल्यात ना! कार्यकर्ते यायलेत टोप्या घ्यायला. कार्यकर्ते ढीगभर टोप्या घेऊन निघून गेले. मालकाने पैसे मोजून गल्ल्यात ठेवले. आता काउंटर रिकामं झालं होतं. मालकाशी बोलणं टाळून आम्ही शोकेसमधल्या टोप्यांचं निरीक्षण करू लागलो.. भगव्या, पांढºया, निळ्या, पिवळ्या टोप्यांनी शोकेस पुरतं भरून गेलं होतं...पांढºया टोपीचा चेहरा कसनुसा झाला होता. चेहºयावर बारा वाजले होते. भगवी मात्र पुरती खुश होती.. चेहरा खुलला होता. निळ्या, पिव्ळ्या अन् इतर रंगांच्या टोप्या आपापल्या जागेवर शांत बसून होत्या... पांढºया टोपीची उदासी पाहून आम्हालाच राहवलं नाही. सरळ मालकालाच विचारायचं ठरवलं.. मालक, ओ मालकऽऽऽ या पांढरीला काय झालंय? नेहमी तर खुलली असतीय अन् आताच काय झालं एकदम?... मालक काही बोलण्याच्या आतच पांढरी टोपी बोलू लागली.. आण्णा, काय सांगू तुम्हाला? गेली सत्तर वर्षे माझं पुढारी अन् कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अढळ स्थान व्हतं. पण या भगव्या टोपीनं माझी जागा छिनली.. आता काउंटरवर आलेले गिराईक माझ्याकडं बघ नं बी झालेत... इलेक्शनच्या काळात कुठं नको, कुठं जाऊ, अशी माझी अवस्था व्हायची, आता टोपी डोक्यावरच काय? हातात घ्यायला बी कोण तयार नाय... सर्व त्या भगवीची मागणी करू लागलेत. बघा.. बघा, कशी आकडायला लागलीय ती. मलाही त्या पांढºया टोपीची स्थिती पाहून वाईट वाटलं.. काय करणार बिच्चारी?

इलेक्शनच्या       तोंडावर ते हातवाले, घड्याळवाले नेते-पुढारी अन् कार्यकर्ते कमळवाल्यांच्या पक्षात गेल्यानं पांढºया टोपीची हीच गत व्हायची. पांढरीचं मी सांत्वन करू लागलो.. बये, काळाचा महिमा हा!.. आजकाल  तत्त्वाचं राजकारण कुठं चाललंय?.. राजकारण हा आता व्यवसाय झालायं. ‘जिकडं खोबरं, तिकडं चांगभलं’ म्हणण्याचा जमाना आहे.. पण काळजी  करू नको. निष्ठावंत अजूनही आहेत. बघितलंय परवा, ते घड्याळवाल्यांचे जुने जाणते नेते इथं आले होते. गर्दी होती की त्यांच्याभोवती!.. मग असे निष्ठावंत, पर्यायचं नाही म्हणून बनलेले काही निष्ठावंत येतील की, तुला न्यायला!.. त्यामुळे   अशी हारून बसू नको... आता भगव्या टोपीचे दिवस आहेत. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार कर अन् निवडणुकीला सामोरं जा !

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर