शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

टोप्यांची दुनिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:49 IST

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीचा कानोसा...

रविंद्र देशमुख

नवीपेठ अन् टिळक चौकातील टोप्यांच्या दुकानात वर्दळ वाढायला लागलीय. सध्या उन्हाळा नाही अन् पावसाळाही परतायला लागलाय. पक्षपंधरवडा जाण्याच्या मार्गावर असला तरी तोंडावर नवरात्र आहे. त्यामुळे लगीन सराई तर नाहीच नाही. मग टोप्यांच्या दुकानात कुठून आलीय गर्दी?.. आता आम्ही पक्के सोलापुरी. आमचं डोकं फास्ट चालतंय. टोप्यांच्या दुकानातली गर्दी कशामुळे? हे न ओळखायला आम्ही काय येडं बिडं आहोत काय? इलेक्शन आहे ना! कार्यकर्ते, नेते येत असतील टोप्या घ्यायला! आम्ही बरोब्बर ओळखलं.

दुकानातल्या हालचाली समजून घ्यायला थेट आत गेलो.. नमस्कार ओ मालक. काय सध्या तुमची जोरदार चलती सुरू हाय. महाळाच्या महिन्यातबी जोरदार धंदा करालावं.. मालक म्हणाले, व्हय व्हय. निवडणुका आल्यात ना! कार्यकर्ते यायलेत टोप्या घ्यायला. कार्यकर्ते ढीगभर टोप्या घेऊन निघून गेले. मालकाने पैसे मोजून गल्ल्यात ठेवले. आता काउंटर रिकामं झालं होतं. मालकाशी बोलणं टाळून आम्ही शोकेसमधल्या टोप्यांचं निरीक्षण करू लागलो.. भगव्या, पांढºया, निळ्या, पिवळ्या टोप्यांनी शोकेस पुरतं भरून गेलं होतं...पांढºया टोपीचा चेहरा कसनुसा झाला होता. चेहºयावर बारा वाजले होते. भगवी मात्र पुरती खुश होती.. चेहरा खुलला होता. निळ्या, पिव्ळ्या अन् इतर रंगांच्या टोप्या आपापल्या जागेवर शांत बसून होत्या... पांढºया टोपीची उदासी पाहून आम्हालाच राहवलं नाही. सरळ मालकालाच विचारायचं ठरवलं.. मालक, ओ मालकऽऽऽ या पांढरीला काय झालंय? नेहमी तर खुलली असतीय अन् आताच काय झालं एकदम?... मालक काही बोलण्याच्या आतच पांढरी टोपी बोलू लागली.. आण्णा, काय सांगू तुम्हाला? गेली सत्तर वर्षे माझं पुढारी अन् कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अढळ स्थान व्हतं. पण या भगव्या टोपीनं माझी जागा छिनली.. आता काउंटरवर आलेले गिराईक माझ्याकडं बघ नं बी झालेत... इलेक्शनच्या काळात कुठं नको, कुठं जाऊ, अशी माझी अवस्था व्हायची, आता टोपी डोक्यावरच काय? हातात घ्यायला बी कोण तयार नाय... सर्व त्या भगवीची मागणी करू लागलेत. बघा.. बघा, कशी आकडायला लागलीय ती. मलाही त्या पांढºया टोपीची स्थिती पाहून वाईट वाटलं.. काय करणार बिच्चारी?

इलेक्शनच्या       तोंडावर ते हातवाले, घड्याळवाले नेते-पुढारी अन् कार्यकर्ते कमळवाल्यांच्या पक्षात गेल्यानं पांढºया टोपीची हीच गत व्हायची. पांढरीचं मी सांत्वन करू लागलो.. बये, काळाचा महिमा हा!.. आजकाल  तत्त्वाचं राजकारण कुठं चाललंय?.. राजकारण हा आता व्यवसाय झालायं. ‘जिकडं खोबरं, तिकडं चांगभलं’ म्हणण्याचा जमाना आहे.. पण काळजी  करू नको. निष्ठावंत अजूनही आहेत. बघितलंय परवा, ते घड्याळवाल्यांचे जुने जाणते नेते इथं आले होते. गर्दी होती की त्यांच्याभोवती!.. मग असे निष्ठावंत, पर्यायचं नाही म्हणून बनलेले काही निष्ठावंत येतील की, तुला न्यायला!.. त्यामुळे   अशी हारून बसू नको... आता भगव्या टोपीचे दिवस आहेत. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार कर अन् निवडणुकीला सामोरं जा !

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर