शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

सोलापूर-हैदराबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 08:32 IST

जिल्हाधिकाºयांनी ठेकेदाराला दिलेली मार्चची मुदतही संपली, काम काही पूर्ण होईना

ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून काम रखडल्याने येथील वाहनधारकांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहेसुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा मार्ग मोकळा करून गतीने काम पूर्ण व्हावेसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते दहिटणे फाटापर्यंत चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मार्च २0१९ ची मुदत दिली होती. ही मुदतही संपली असून, काम काहीकेल्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरालगतच  मार्केट यार्ड ते नवीन हैदराबाद जकात नाका या परिसरातच काम रखडले गेले आहे. 

सोलापूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर -हैदराबाद राष्ट्रीय महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे. दोन ते अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही या कामास अपेक्षित कालावधीपेक्षा दुप्पट कालावधी लागत आहे. कामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अरुंद रस्ता तर काही ठिकाणी कच्चा रस्ता ठेवण्यात आल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होताना दिसून येत आहे. 

सोलापूरपासून शंभर किलोमीटरपर्यंतचे काम सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली होत आहे. ठेकेदाराकडून विहीत मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने या कार्यालयाकडून ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली होती. मात्र दिल्ली येथील कार्यालयाकडून पुन्हा या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिलेली मुदतही पुन्हा संपल्याने हे काम कधी पूर्ण होणार याबाबत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कदम यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या रखडलेल्या कामाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांची दोनदा बैठक घेतली आहे. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मार्च २0१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यांनी दिलेली ही मुदतही संपल्याने जिल्हाधिकारी याबाबत आता काय भूमिका घेतात, याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. 

खुल्या जागेत ट्रान्स्पोर्टधारकांचे अतिक्रमण - मार्केट यार्डपासून ते घरकुलपर्यंत चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर ट्रान्स्पोर्ट कंपनीकडे आलेले ट्रकही याच ठिकाणी दिवसभर थांबतात. मोकळ्या जागेत या ठिकाणी ट्रान्स्पोर्टच्या ट्रकनी अतिक्रमण केल्याचे दिसते.

धुळीमुळे दुचाकीधारकांचा प्रवास थांबला- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते दहिटणे फाटापर्यंत चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यात माती व खडी टाकण्यात आल्याने चारचाकी वाहनांमुळे प्रचंड धुळीचे लोट उडत आहेत. दुचाकीधारकांना धुळीचा त्रास होत असल्याने या महामार्गावरून न जाता दुचाकीधारक अन्य पर्यायी मार्ग अवलंब करताना दिसून येताहेत. घरकुल, मित्रनगर आदी भागातून दुचाकीधारकांची वर्दळ वाढत आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण काम लवकर होणे आवश्यक आहे. मात्र हे करताना कामात गती व सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून काम रखडल्याने येथील वाहनधारकांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा मार्ग मोकळा करून गतीने काम पूर्ण व्हावे.-जगदीश अळ्ळीमारे, प्रवासी

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूक