शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Women's Day Special : लई वाटतंय, आपलीबी जिंदगी सुधरावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:48 IST

श्रमकरी लोहार समाजातील माय-माऊलींनी व्यक्त केली व्यथा

ठळक मुद्देसोलापूर शहरात सध्या १२०० च्या आसपास लोहार, घिसाडी समाज वास्तव्यास आहेतप्रत्यक्षात भात्याद्वारे लोखंडी अवजारे करून आपली उपजीविका करणारी १०० कुटुंबं पुरुषांच्या जोडीला या व्यवसायात महिलांना दिवसभर भात्यावर कधी कातीन ओढत तर कधी हातोडीने ऐरणीवर तापलेल्या लोखंडावर घाव घालण्याचे काम करावे लागते

विलास जळकोटकर 

सोलापूर: धन्याच्या बरोबर दिवसभर राबराब राबायचं.. त्यंच्या जोडीला पदर खोचून काम करावं तवा चार पैसे मिळत्यात आन् मगच चूल पेटवावी लागत्ये. आम्हालाबी लई वाटतंय थोरामोठ्याप्रमाणं आपली बी जिंदगी सुधरावी, पण नुसतंच म्हणून काय उपेग. कर्जपाणी काढून कायतर करावं म्हणलं तर तितं कायतरी कारण सांगून अडवं लावत्यात. सरकारनं आमचं गाºहाणं ऐकून मदत करावी, अशी व्यथा लोहार, घिसाडी समाजातील माय-माऊलींसह कर्त्या मंडळींनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 

सोलापूर शहरात सध्या १२०० च्या आसपास लोहार, घिसाडी समाज वास्तव्यास आहेत. प्रत्यक्षात भात्याद्वारे लोखंडी अवजारे करून आपली उपजीविका करणारी १०० कुटुंबं आहेत. अन्य वर्ग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये विखुरला आहे. श्रमाचं काम म्हणून नवी पिढीही या व्यवसायाकडं धजावत नाही. पुरुषांच्या जोडीला या व्यवसायात महिलांना दिवसभर भात्यावर कधी कातीन ओढत तर कधी हातोडीने ऐरणीवर तापलेल्या लोखंडावर घाव घालण्याचे काम करावे लागते. परिस्थितीमुळे शिक्षणाचं प्रमाण कमी आणि त्यामुळं पारंपरिक व्यवसायावरच गुजराण करावी लागते, हे वास्तव पोलीस मुख्यालयाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीतल्या समाजबांधवांचं नेतृत्व करणाºया बालाजी साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. 

काळ बदलतोय तसं आमच्या समाजातील महिला, पोराबाळांनाही बदलावंसं वाटतंय. पण शिकल्यासवरल्या पोरांनाही सरकारकडून सोयी मिळत नाहीत. कर्ज प्रकरणं करावी म्हणलं तर कोणी दाद लागू देत नाही. सरकारनं सहानुभूतीनं आमच्याकडं पहावं. आमच्या नशिबी असलेलं ऐरणीवर घाव घालण्याचे दिवस संपावेत, असं राहून राहून वाटतंय, अशी व्यथा सोलापूर-पुणे महामार्गावर जालनाहून आलेले राम पवार, सचिन पडुलकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

पडुलकर यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालंय. लोहारकाम करणं हेच त्यांचं चरितार्थाचं साधन आहे, त्यासाठीच भटकंती करत सोलापूर मुक्कामी आले आहेत. त्यांना तीन मुली असून, परिस्थितीमुळं त्यांच्या शिक्षणाचाही पत्ता नाही. शेतीसाठी लागणारी कुºहाड, फास, बेडगे, फावडे, खोºया, खुरपे, विळ्या, सत्तूर, पहार, शेर, अडणी अशी अवजारे तयार करायची आणि गावोगावी विकून त्यावर संसार चालवायचा हे या कुटुंबाचं जगणं. ही व्यवस्था बदलली पाहिजे.

सन्मानानं जगण्याचा हक्क मिळावा!पोलीस मुख्यालयालगत असलेल्या राहुल गांधी झोपडपट्टीत पन्नासेक घिसाडी कुटुंबं वास्तव्यास आहेत. भवानी पेठ, वैदू वस्ती, हनुमान नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा समाज लोखंडी अवजारे तयार करतो. शहर-जिल्ह्यात हा समाज विखुरला आहे. आर्थिक चणचणीमुळे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे पारंपरिक व्यवसायावर यांची गुजरण सुरू आहे. सरकारच्या जाचक अटींमुळेही सवलतीचा फायदा मिळत नाही, यावर तोडगा काढून सन्मानानं जगण्याचा हक्क मिळावा, अशी मागणी बालाजी साळुंखे यांच्यासह बांधवांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला