शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

धार्मिक तेढ वाढविण्यासाठी शहराचे नाव बदलण्याचा घाट, अबू आझमींचा आरोप

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 23, 2022 16:02 IST

Abu Azmi : उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोलापूर : देशात काही शहरांचे नाव बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातही हा प्रकार होत आहे. मीर उस्मानअली यांच्यावरुन उस्मानाबाद हे नाव  पडले. उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे शनिवारी सोलापुरात होते. सोलापुरातून उस्मानाबाद येथे जाण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात जे हिंदू-मुस्लीम दरी वाढत आहे. ही दरी कमी करायचे असेल तर बंधुत्व वाढायला हवे. हाच बंधुत्वाचा विचार घेऊन मी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अबू आझमी म्हणाले, भाजपला रोखण्यासाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. पण, त्यांनी बाबरी मशीद आम्ही पाडली असे म्हणत आमच्या जुन्या जखमा उकरुन काढल्या. याची आम्हाला खंत वाटते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात मौलाना आर्थिक महामंडळ, हज कमिची, उर्दू घरासाठी त्यांनी काही काम केले नाही.

स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी उर्दू ठरली. ही भाषा या देशातील असताना आज उर्दूला परदेशी ठरवत आहेत. मुस्लीम युवकांना बेकायदेशीरपणे जेलमध्ये टाकले आहे. जे निर्दोष असतील त्यांना सोडायला हवे, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली.

'...तर देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल'केंद्र सरकार हे देश विकण्याचे काम करत आहे. खासगीकरण करुन आरक्षण काढून घेत आहे. रेल्वे, विमान या सेवा काही मोजक्याच खासगी व्यावसायिकांच्या घशात घालण्यात येत आहे. आता देशावर 136 लाख कोटी कर्ज आहे. मगाहाई वाढत चालली आहे, असेच राहीले तर देश श्रीलंका सारखे बनेल, असे अबू आझमी म्हणाले.

'...मग हिजाबला विरोध का?'याचबरोबर, अभिनेता रणवीर सिंगच्या नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटचा उल्लेख अबू आझमी यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यूड फोटोशूट खपवून घेतला जात असेल तर मग आपल्या मर्जीने परिधान केलेल्या हिजाबला विरोध का? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSolapurसोलापूर