शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लॉकडाऊनमधील लग्नासाठी जवळचे ५० कोण? हे ठरवताना होतेय मोठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:54 IST

आपले लग्न वाजतगाजत वरातीने व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, आवाज आला तर कारवाई होईल या भीतीने वरात काढण्यात आली नाही

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त ५० जणांना परवानगी देण्याच्या नियमाने जास्त अडचण होत आहे. नेमक्या कोणत्या ५० जणांना बोलवायचे हा प्रश्न वधू-वरांच्या वडिलांना पडत आहे.

जून महिन्यामध्ये लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी पोलिसांकडे जावे लागत होते. त्यानंतर ही जबाबदारी महापालिकेच्या झोन कार्यालयाकडे देण्यात आली. ५० जणांनाच परवानगी असल्याने अनेकांसमोर अडचणी आल्या. मात्र, यातूनही अनेकांनी मार्ग काढले. काहींनी लग्नाच्या आधीही जेवणाची पंगत वाढली. जेणेकरून जेवण केलेले अक्षता झाल्यावर घरी परत जाऊ शकतील. उर्वरित पाहुणे अक्षता झाल्यानंतर जेवण करून गेले.

आपले लग्न वाजतगाजत वरातीने व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, आवाज आला तर कारवाई होईल या भीतीने वरात काढण्यात आली नाही. अनेकांनी परवानगी न काढताही कार्यक्रम उरकले. अंगणात किंवा घराजवळ असणाऱ्या मंगल कार्यालयात लग्नाचा कार्यक्रम घेतलेल्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले तर अनेकांनी लग्नपत्रिका प्रत्यक्ष न देता सोशल मीडियावरून दिली. या पत्रिकेत दुरूनच आशीर्वाद देण्याची विनंती करण्यात आली.

----------------

लग्नासाठी नियमावली

 

  • - ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
  •  
  • - मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे
  •  
  • - हॅण्डवॉश, सॅनिटायजरचा वापर करणे
  •  
  • - थर्मल स्कीनिंगद्वारे प्रत्येकाची तपासणी
  •  
  • - संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे
  •  
  • - मंगल कार्यालयात एअरकंडिशनचा वापर न करता हवा खेळती राहण्यची व्यवस्था करणे

-------

परवानगीसाठी माेठी कसरत

  • -परवानगी कुणाची घ्यायची हेच बहुतांश जणांना माहिती नसते. परवानगीसाठी पालिकेच्या झोन कार्यालयात जाणे आवश्यक असताना अनेकजण पोलीस ठाणे किंवा महापालिकेत जात आहेत.
  • - सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागत असल्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या पाहुण्यांची यादी नोंदवावी लागते.

 

माझ्या भावाचे लग्न मोठ्या उत्सवाप्रमाणे करायचे होते. लग्न ठरल्यानंतर लॉकडाऊन आल्यामुळे खूप निर्बंध आले. फक्त ५० माणसात कार्यक्रम करावा लागला. अनेक पाहुणे मंडळी नाराज झाले. वाजत-गाजत वरात काढण्याचेही राहून गेले.

- सचिव लोंढे, वरबंधू

परवानगी कुठून घ्यायची यापासून अडचणीस सुरुवात झाली. पोलीस ठाणे, महापालिका येथे गेल्यानंतर कळले की झोन कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. लग्न सुरू असतानाही कोरोना संशयित कुणी आले तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली.

- प्रकाश पाटील, वधूपिता

॰॰॰॰॰॰॰॰॰॰

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या