शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:32 AM

शनिवार दि. १७ नोव्हेंबरच्या लोकमतमधील बातमी ‘दारूसाठी पैशाची मागणी, मुलाने केली आई-वडिलांना मारहाण’. जन्मल्यानंतर किती आनंदात त्याचे बारसे साजरे ...

ठळक मुद्देवाचकहो, विचारी मनाने एकनाथ महाराजांनी म्हटलेले लक्षात ठेवावे‘‘कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाय जन्मासि आली’ ती त्वा आपुली मानली, कैसी रे पढतमूर्खा  ’’

शनिवार दि. १७ नोव्हेंबरच्या लोकमतमधील बातमी ‘दारूसाठी पैशाची मागणी, मुलाने केली आई-वडिलांना मारहाण’. जन्मल्यानंतर किती आनंदात त्याचे बारसे साजरे केले असेल, किती कष्टाने त्या मुलाला आई-वडिलाने वाढवले असेल आणि आज ही अवस्था.  मन दोन महिने मागे गेले. 

दोन महिन्यांपूर्वी भल्या सकाळीच दोघे नवरा-बायको भेटायला आॅफिसात आले. नवºयाला बायकोपासून सोडचिठ्ठी पाहिजे होती. त्यांचे लग्न होऊन पाच वर्षे झाली होती, परंतु त्यांना मूलबाळ झालेले नव्हते. डॉक्टरांकडे हेलपाटे चालू होते. लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता. तरीही मूलबाळ होत नसल्याने त्याचा राग काढत नवरा बायकोला भर आॅफिसात शिव्या देत होता. ती बिचारी अश्रू ढाळत सर्व ऐकून घेत होती. मी त्यास आणखी काही दिवस थांब आणि मूलबाळ झाले नाही तर दत्तक घे, असा सल्ला दिला. तो सारखा म्हणत होता, एखादा तरी मुलगा किंवा मुलगी व्हायला पाहिजे. मी त्याची खूप समजूत घातली, परंतु तो आपला हेका काही सोडत नव्हता. मी त्यास म्हणालो, मी जोडणारा वकील आहे, तोडणारा नाही.. तो आॅफिसमधून निघून गेला.

थोड्याच वेळानंतर एक माणूस आला. त्याला बायकोपासून सोडचिठ्ठी घेऊन दुसरे लग्न करायचे होते. कारण त्यास चार मुलीच होत्या. मुलगा नव्हता. मी त्याची खूप समजूत घातली. त्यास आताच्या आधुनिक काळात महिला किती प्रगती करीत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कशी भरारी मारत आहेत, हे पटवून सांगितले. आता काही दिवसानंतर मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही फरक राहणार नाही हे देखील सांगितले, परंतु तो त्याचा हेका सोडण्यास तयार नव्हता. त्यास देखील सांगितले, बाबा, मी जोडणारा वकील आहे, तोडणारा नाही. त्यानंतर पुढे काही दिवसातच एक वृद्ध महिला मुलावर केस दाखल करण्यासाठी आली. तिच्या मुलाने तिला बेदम मारहाण करुन तिचे डोके फोडले होते. मी तिला विचारले, किती नवस केले होते? ती म्हणाली - चार. मेडिकल सर्टिफिकेटमध्ये देखील चारच जखमा डोक्यावर होत्या. मी म्हणालो, पोरगं नवसाची फेड करतोय. मी तिला सल्ला दिला, मुलीकडे जाऊन राहा. ती उत्तरली, मुलगी नाही हो मला ! नाही तर कशाला या नालायकाकडे राहिले असते. पोरगी असती तर लईच बरं झालं असतं बघा.     

वाचकहो लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या पोटी चार प्रकारची पोरं जन्माला येतात. १) घेणेकरी पुत्र - मागच्या जन्मीचे घेणेकरी या जन्मी पुत्र म्हणून जन्माला आलेली असतात. त्याला शिकवा, नोकरीला लावा, लग्न करून द्या. त्याचे देणे-घेणे पूर्ण झाले की तो आई-बापाला टाकून निघून जातो. २) शत्रू पुत्र - गतजन्मीचा शत्रू या जन्मी मुलगा म्हणून जन्माला येतो. अशी पोरं अगर पोरी जन्मभर आई-बापाला त्रास देतात आणि दु:ख देतात. ३) उदास पुत्र - ही पोरं वडिलांना सुख देत नाहीत अगर दु:खपण देत नाहीत. ४) सेवेकरी पुत्र - मागच्या जन्मी तुम्ही ज्याची सेवा केली तो या जन्मी तुमचा मुलगा होऊन येतो. असा मुलगा आई-वडिलांना खूप सुख देतो. गतजन्मी पुण्य केले असल्यास सेवेकरी पुत्र पोटी जन्माला येतात आणि जन्मभर आई-बापाची सेवा करतात. 

हे तर उघडच आहे की, आपल्या पोटी आलेले जे मुलबाळं असतात, ती काही आपल्याला सुख द्यायला येतात किंवा दु:ख देण्यासाठी येतात. प्रारब्धाचा योगच असा की, ते त्याकरिताच येतात. आपण ते जर लक्षात ठेवून वागलो नाही तर हा मुलगा असा का आणि तो मुलगा तसा का ? याला उत्तर मिळत नाही. तो कशाकरिता आला आहे हे तर ठरलेलेच आहे. समर्थांची एक ओवी आहे. ‘‘कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाय जन्मासि आली’ ती त्वा आपुली मानली, कैसी रे पढतमूर्खा  ’’

    बघा दुनियादारी, मुलंबाळं नसलेले दु:खी, केवळ मुली असलेले दु:खी आणि मुलगा असलेला पण मुलगी नसलेले देखील दु:खी ?संत श्री रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकात म्हटले आहेच जगी सर्व सुखी असा कोण आहे!विचारें मना तूंचि शोधूनि पाहें!मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले!तयासारखें भोगणें प्राप्त झाले!!  .. आणि वाचकहो, विचारी मनाने एकनाथ महाराजांनी म्हटलेले लक्षात ठेवावे.   ऐसे असावे संसारी   जोवरी प्राचीनाची दोरी   पक्षी अंगणासी आले  आपुला चारा चरोनि गेलो!     - अ‍ॅड. धनंजय माने(लेखक ज्येष्ठ विधीज्ञ आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाFemale Foeticideस्त्रीभ्रूणहत्या