शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

इलेक्शननं दिला कुठं हादरा.. कुठं दिलासा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ७२ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकताच लागला. त्यामध्ये तालुका पातळीवरील काही पुढाऱ्यांना मतदारानी झटका दिला ...

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ७२ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकताच लागला. त्यामध्ये तालुका पातळीवरील काही पुढाऱ्यांना मतदारानी झटका दिला तर काहीजण गाव ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले. यामुळे जिंकलेल्या गटामध्ये उत्साह पसरला आहे, तर पराभव झालेली मंडळींच्या गटामध्ये सन्नाटा पसरला आहे. अनेकांना या निवडणुकीनं आत्मपरीक्षण करायला लावलं आहे.

विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हन्नर गाव पारंपरिक विरोधक भरमशेट्टी गटांना सोबत घेऊन कधी नव्हे यंदा काही उमेदवार बिनविरोध केले, तर तिसऱ्या गटाने काही जागेसाठी निवडणूक लावून आव्हान दिले होते. त्या सर्व जागा कल्याणशेट्टी गटाने एकतर्फी जिंकून आणल्या. माजी आमदार सिद्रमप्पा पाटील गटाने कुमठे गाव पन्नास वर्षांपासून आजही बिनविरोध करून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या चिंचोळी (मैं.) ग्रामपंचायतमध्ये स्थानिक गटांनी बाजी मारली. चप्पळगाव जिल्हा परिषद गटाचे भाजपच्या सदस्या मंगल कल्यांणशेट्टी यांनी आपले हन्नूर गाव जिंकून निवडणुकीच्या निमित्ताने तंटामुक्त केले. नागणसूर गटाचे काँग्रेसचे सदस्य शीलवंती भासगी यांच्या नागणसूर गावी स्थानिक गटाची सत्ता आली. जेऊर गटाचे काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी तिसऱ्या पिढीपासून ताब्यात राहिलेले गाव यंदाही काबीज केले.

मंगरूळ गटाचे अपक्ष सदस्य शिवानंद पाटील यांनी कुमठे गाव सदस्य बिनविरोध करून परंपरा यंदाही कायम ठेवली. चप्पळगाव गणाचे पंचायत समितीचे भाजप सदस्य के. पी. पिरजादे यांनी काँग्रेसच्या परंपरागत गटाच्या विरोधात यंदाही विरोधी गट तयार करून निवडणूक लढले. सत्ता आली नसलीतरी चुरशीची निवडणूक करून सत्ताधाऱ्यांना पाच, तर विरोधी गटाला चार जागा मिळाल्या. साफळे गटाचे भाजपचे सदस्य राजेंद्र बंदीछोडे यांच्या हातून १५ वर्षांचे सत्ता हिसकावून घेण्यात विरोधक यशस्वी ठरले. बंदिछोेडे गटाचे तीन सदस्य ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराज होऊन विरोधी गटात गेल्याने त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे.

वागदरी येथील भाजपचे सदस्य गुंडप्पा पोमाजी यांच्या गटाचा पराभव करीत विरोधी गटाने बाजी मारली. सलगर गणाचे काँग्रेसचे सदस्य भौरम्मा पुजारी मिरजगी गाव पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले. मुगळी गणांचे काँग्रेसचे सदस्य आनंदराव सोनकांबळे यांना आपले भोसगे गाव ताब्यात ठेवण्यात अपयश आले. विरोधकांनी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. तोळणूर गणाचे भाजपच्या सदस्य कविता हिरेमठ यांच्या हैद्रा गावात विरोधी गटाने बाजी मारली. नागणसूर गणांचे काँग्रेसचे सदस्य नितीन ननावरे यांच्या गौडगाव बु. मूळगावी यंदाही विरोधी गटाने मैदान जिंकले. सुलेरजवळगे गणांचे अपक्ष सदस्य सुरेखा गंगदे यांच्या मुंढेवाडी गावात काठावर सत्ता आली. जेऊर गणाचे काँग्रेसचे सदस्य माजी सभापती सुरेखा काटगाव यांनी आपले हंद्राळ गाव बिनविरोध करून आपल्या गटाचे संख्याबळ अधिक ठेवण्यात बाजी मारली. दहिटणे गणांचे काँग्रेसचे सदस्य विलास गव्हाणे यांचे दोड्याळ गाव अनेक वर्षांपासून ताब्यात ठेवले. यंदा नऊ पैकी सात जागा बिनविरोध होऊन केवळ दोन जागेसाठी निवडणूक झाली. तेही बिनविरोध समितीचे निवडून आले. बोरोटी या गावी भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड गटाने मागील पंचवीस वर्षांपासून आजही सत्ता अबाधित ठेवली आहे.