शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:23 IST

‘ईव्हीएम’च्या विरोधासाठी मतदारसंघात १०० उमेदवार उभे करा

ठळक मुद्देसध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला - लक्ष्मणराव मानेआमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे - लक्ष्मणराव मानेमहाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली - लक्ष्मणराव माने

सोलापूर : प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. प्रकाश आंबेडकर जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांबरोबर येण्यास तयार असतील तर माझा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष त्यांच्या आघाडीत विलीन करायला आपण तयार आहोत, असे प्रतिपादन या पक्षाचे प्रमुख, माजी आमदार लक्ष्मणराव माने यांनी केले.

 

दरम्यान, जे लोक ईव्हीएम विरोधात आहेत, त्यांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी भरावी. एका मतदारसंघात शंभर ते दीडशे उमेदवार लढल्यास ईव्हीएमची यंत्रणा कोसळणार आहे. तेव्हा मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ते पुढे म्हणाले , आज  भाजप देशाचे संविधान बदलत आहे. ३७० कलम ज्याप्रमाणे हटवले हे त्याचे उदाहरण आहे. भाजप जरी पडद्यावर असला तरी ‘आरएसएस’ ही  संघटना देश चालवत आहे. त्यासाठी भाजपला आज हरवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे शत्रू ते आमचे मित्र अशी आपली भूमिका आहे. भाजपविरोधी जे पक्ष असतील त्यांच्या आघाडीत आपण सामिल होऊ.

सध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे. ७५  जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात महाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली आहे. जर  आघाडीने आम्हाला जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन आमचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. 

या पत्रकार परिषदेला माने, मुस्लीम लीगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला डोणगावकर, सलाउद्दीन शेख, हकीम शेख, निजाम शेख आदी उपस्थित  होते.

..तर ‘मातोश्री’वर जाऊ !- प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली आहे. मात्र नातवंडे सुधारत असतील तर आपल्याला ‘मातोश्री’वर जाण्यास आवडेल, असे माने यांनी सांगत आमचा लढा भाजपबरोबर आहे.एकवेळ आम्ही शिवसेनेसोबत बोलणी करू.कारण भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत, असे त्यांनी सांगितले.

पाच जागांची मागणीमहाराष्टÑ बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगने जिल्ह्यातील ५ जागांची मागणी केली आहे.  यामध्ये मोहोळ, माळशिरस, दक्षिण अक्कलकोट मतदारसंघांचा समावेश आहे. तर दोन्ही पक्षांनी शहर मध्यची जागा मागितली आहे. यातील काही जागा काँंग्रेस-राष्ट्रवादीने द्याव्यात, असे माने यांनी म्हटले आहे. मध्य जागेवर  आम्ही एकत्र बसून तोडगा काढू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरlaxman maneलक्ष्मण मानेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण