शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:23 IST

‘ईव्हीएम’च्या विरोधासाठी मतदारसंघात १०० उमेदवार उभे करा

ठळक मुद्देसध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला - लक्ष्मणराव मानेआमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे - लक्ष्मणराव मानेमहाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली - लक्ष्मणराव माने

सोलापूर : प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. प्रकाश आंबेडकर जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांबरोबर येण्यास तयार असतील तर माझा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष त्यांच्या आघाडीत विलीन करायला आपण तयार आहोत, असे प्रतिपादन या पक्षाचे प्रमुख, माजी आमदार लक्ष्मणराव माने यांनी केले.

 

दरम्यान, जे लोक ईव्हीएम विरोधात आहेत, त्यांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी भरावी. एका मतदारसंघात शंभर ते दीडशे उमेदवार लढल्यास ईव्हीएमची यंत्रणा कोसळणार आहे. तेव्हा मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ते पुढे म्हणाले , आज  भाजप देशाचे संविधान बदलत आहे. ३७० कलम ज्याप्रमाणे हटवले हे त्याचे उदाहरण आहे. भाजप जरी पडद्यावर असला तरी ‘आरएसएस’ ही  संघटना देश चालवत आहे. त्यासाठी भाजपला आज हरवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे शत्रू ते आमचे मित्र अशी आपली भूमिका आहे. भाजपविरोधी जे पक्ष असतील त्यांच्या आघाडीत आपण सामिल होऊ.

सध्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, मुस्लीम लीगसह दोन  पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे. ७५  जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात महाराष्ट्र बहुजन आघाडीने ३३ तर मुस्लीम लीगने १५  जागांची मागणी केली आहे. जर  आघाडीने आम्हाला जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन आमचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. 

या पत्रकार परिषदेला माने, मुस्लीम लीगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला डोणगावकर, सलाउद्दीन शेख, हकीम शेख, निजाम शेख आदी उपस्थित  होते.

..तर ‘मातोश्री’वर जाऊ !- प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली आहे. मात्र नातवंडे सुधारत असतील तर आपल्याला ‘मातोश्री’वर जाण्यास आवडेल, असे माने यांनी सांगत आमचा लढा भाजपबरोबर आहे.एकवेळ आम्ही शिवसेनेसोबत बोलणी करू.कारण भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत, असे त्यांनी सांगितले.

पाच जागांची मागणीमहाराष्टÑ बहुजन वंचित आघाडी आणि मुस्लीम लीगने जिल्ह्यातील ५ जागांची मागणी केली आहे.  यामध्ये मोहोळ, माळशिरस, दक्षिण अक्कलकोट मतदारसंघांचा समावेश आहे. तर दोन्ही पक्षांनी शहर मध्यची जागा मागितली आहे. यातील काही जागा काँंग्रेस-राष्ट्रवादीने द्याव्यात, असे माने यांनी म्हटले आहे. मध्य जागेवर  आम्ही एकत्र बसून तोडगा काढू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरlaxman maneलक्ष्मण मानेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण