शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कशी वाटली आयडिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:29 IST

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून ...

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून बºयाच अंशी कोरड्या पावसाला सामोरे जावे लागले. दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावून सोलापुरी पोशिंद्याला सुखावून सोडल्याने आनंदी आनंद वातावरण आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यंदाही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती आपल्याला भेडसावत होती. त्याचवेळी माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. माझ्या वर्गासमोर तीन-चार फुटाचं एक बाळसं धरलेलं झाड आहे. रोज संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर दुसरीच्या वर्गातली एक मुलगी त्या झाडाजवळ वॉटर बॅग रिकामी करून जायची.

चार-पाच दिवस लक्ष देऊन मी तिच्या नित्यक्रमाचा निरीक्षण करत होतो, पण तिच्या या उपक्रमात काही खंड पडला नाही. न राहवून मी तिला जवळ बोलावून विचारलं, ‘अगं बाळा! तू रोज त्या झाडाजवळ वॉटर बॅगमधील पाणी का सांडतेस गं.’ ती सहज बोलून गेली, ‘शाळेतून घरी जाईपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. वॉटर बॅगमधील पाणी रस्त्यावर सांडले की तसंच राहतं.’ ‘हो पण त्याने काय होतंय?’ माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना ती बोलली, ‘सांडलेल्या पाण्यात कुणीतरी घाण पाय ठेवलं की रस्ता खराब होतो ना! त्या झाडाजवळ माती आहे ना,  तिथे सांडल्यावर पाणी गडप होतं ना, म्हणून सांडते..’ बोलत बोलतच ती निघून गेली. या तिच्या बोलण्याचा प्रभाव मात्र माझ्या विचारांवर पडला. त्या छकुलीचे उत्तर जरी वेगळे असले तरी तिच्या आयडियाची कल्पना आपण इतर मुलांच्या डोक्यात घातली तर? मी थोडं डोकं खाजवून दुसºया दिवशी परिपाठावेळी त्या छकुलीच्या कल्पनेला आकार देण्याच्या विचारात गर्क झालो.दुसºया दिवशी परिपाठावेळी सर्व मुलांना सूचना केली, ‘आजपासून सर्व मुलांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बाटलीत किंवा वॉटर बॅगेत शिल्लक असलेलं पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओता.’ मग काय अंमलबजावणी त्याच दिवसापासून सुरूही झाली.

सुरुवातीला एक-दोन, नंतर तीन्-चार आणि मग पुढे सर्वच मुले शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील, बाटलीतील राहिलेले पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओतून जाऊ लागली. सुकलेली, हिरमुसलेली रोपटी तग धरून राहिली, काही दिवसांनंतर त्या झाडांची दोन-चार फुटांनी उंचीही वाढलेली दिसून आली. मग काय मुलांमध्ये आणखी हुरूप आला व त्यांनी आपले कार्य जोमातच चालू ठेवले. काही दिवसांनी शाळेत चाललेली चिमुकल्यांची ही लुडबुड त्या छकुलीच्या लक्षात आली. कदाचित तिच्या लक्षात आलं असावं की, ‘आपल्याला सरांनी झाडाला पाणी ओतताना पाहिलं, काहीबाही विचारलं व इतरांनाही पाणी ओतायला लावलं. पण हे सारं माझ्यामुळेच घडलं ! ‘म्हणून की काय एकदा ती आपल्या मैत्रिणीला सहज म्हटली, ‘कशी वाटली आयडिया!’ आणि नेमकं हे मला ऐकायला आलं, पण मित्रहो तिची ही कल्पना मला तर आवडली हं! तुम्हालाही आवडेलच नक्की.. विचार काय करताय ‘राबवा तुम्हीही!’ मुलांनी आरंभलेला हा नवा अध्याय त्यांच्यासाठी मजेची बाब आहे, परंतु आपल्यासारख्या लोकांसाठी  परिवर्तनाची नांदी आहे.- आनंद घोडके(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरIdeaआयडिया