शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कशी वाटली आयडिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:29 IST

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून ...

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून बºयाच अंशी कोरड्या पावसाला सामोरे जावे लागले. दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावून सोलापुरी पोशिंद्याला सुखावून सोडल्याने आनंदी आनंद वातावरण आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यंदाही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती आपल्याला भेडसावत होती. त्याचवेळी माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. माझ्या वर्गासमोर तीन-चार फुटाचं एक बाळसं धरलेलं झाड आहे. रोज संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर दुसरीच्या वर्गातली एक मुलगी त्या झाडाजवळ वॉटर बॅग रिकामी करून जायची.

चार-पाच दिवस लक्ष देऊन मी तिच्या नित्यक्रमाचा निरीक्षण करत होतो, पण तिच्या या उपक्रमात काही खंड पडला नाही. न राहवून मी तिला जवळ बोलावून विचारलं, ‘अगं बाळा! तू रोज त्या झाडाजवळ वॉटर बॅगमधील पाणी का सांडतेस गं.’ ती सहज बोलून गेली, ‘शाळेतून घरी जाईपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. वॉटर बॅगमधील पाणी रस्त्यावर सांडले की तसंच राहतं.’ ‘हो पण त्याने काय होतंय?’ माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना ती बोलली, ‘सांडलेल्या पाण्यात कुणीतरी घाण पाय ठेवलं की रस्ता खराब होतो ना! त्या झाडाजवळ माती आहे ना,  तिथे सांडल्यावर पाणी गडप होतं ना, म्हणून सांडते..’ बोलत बोलतच ती निघून गेली. या तिच्या बोलण्याचा प्रभाव मात्र माझ्या विचारांवर पडला. त्या छकुलीचे उत्तर जरी वेगळे असले तरी तिच्या आयडियाची कल्पना आपण इतर मुलांच्या डोक्यात घातली तर? मी थोडं डोकं खाजवून दुसºया दिवशी परिपाठावेळी त्या छकुलीच्या कल्पनेला आकार देण्याच्या विचारात गर्क झालो.दुसºया दिवशी परिपाठावेळी सर्व मुलांना सूचना केली, ‘आजपासून सर्व मुलांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बाटलीत किंवा वॉटर बॅगेत शिल्लक असलेलं पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओता.’ मग काय अंमलबजावणी त्याच दिवसापासून सुरूही झाली.

सुरुवातीला एक-दोन, नंतर तीन्-चार आणि मग पुढे सर्वच मुले शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील, बाटलीतील राहिलेले पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओतून जाऊ लागली. सुकलेली, हिरमुसलेली रोपटी तग धरून राहिली, काही दिवसांनंतर त्या झाडांची दोन-चार फुटांनी उंचीही वाढलेली दिसून आली. मग काय मुलांमध्ये आणखी हुरूप आला व त्यांनी आपले कार्य जोमातच चालू ठेवले. काही दिवसांनी शाळेत चाललेली चिमुकल्यांची ही लुडबुड त्या छकुलीच्या लक्षात आली. कदाचित तिच्या लक्षात आलं असावं की, ‘आपल्याला सरांनी झाडाला पाणी ओतताना पाहिलं, काहीबाही विचारलं व इतरांनाही पाणी ओतायला लावलं. पण हे सारं माझ्यामुळेच घडलं ! ‘म्हणून की काय एकदा ती आपल्या मैत्रिणीला सहज म्हटली, ‘कशी वाटली आयडिया!’ आणि नेमकं हे मला ऐकायला आलं, पण मित्रहो तिची ही कल्पना मला तर आवडली हं! तुम्हालाही आवडेलच नक्की.. विचार काय करताय ‘राबवा तुम्हीही!’ मुलांनी आरंभलेला हा नवा अध्याय त्यांच्यासाठी मजेची बाब आहे, परंतु आपल्यासारख्या लोकांसाठी  परिवर्तनाची नांदी आहे.- आनंद घोडके(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरIdeaआयडिया