शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:00 IST

६० नंबर फॉर्म भरा : इतर राज्यांत गेला तरी टॅक्सची नाही कटकट

सोलापूर : आरटीओकडून वाहनांसाठी भारत (बीएच) या नावाने क्रमांकांची सिरीज सुरू करण्यात आली आहे. हा नंबर घेतल्यानंतर राज्यात कुठेही राहण्यास गेल्यावर नंबर बदलण्याची गरज नाही व त्या राज्याचा टॅक्सही भरायची कटकट राहिलेली नाही; पण असा नंबर घेण्यासाठी ६० नंबरचा अर्ज भरावा लागणार आहे.

केंद्रीय कर्मचारी व ज्या खासगी कंपन्यांची तीन राज्यांत कार्पोरेट कार्यालय आहेत अशांच्या वाहनांसाठी बीएच नावाने सुरू होणारा नंबर मिळणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहने खाजगी व परिवहन संवर्गात नोंदणी करताना एकदाच टॅक्स भरावा लागणार आहे. रेल्वे, टपाल, दूरसंचार, लष्कर, केंद्रीय राखीव बल, सीमा सुरक्षा बल, नेव्ही, राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलून गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलावी लागते. यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी वाहन नोंदणी केली आहे, त्या कार्यालयातून ट्रान्सफरचा अर्ज सादर करून आरटीओची एनओसी घ्यावी लागते. यासाठी संबंधित पोलिसांचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. उर्वरित टॅक्स रिटर्न घेऊन ज्या राज्यात जावे लागते, तेथील टॅक्स भरून वाहनांची नोंदणी करावी लागते; पण आता बीएच सिरीजमध्ये एकदा नंबर घेतल्यावर देशात कोणत्याही राज्यात गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलाची गरज नाही.

असा असतो हा नंबर

बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला गाडीच्या नोंदणीचे वर्ष, त्यानंतर बीएच व गाडीला मिळालेला क्रमांक आणि शेवटी वाहनाच्या नंबरच्या सिरीजची मुळाक्षरे असणार आहेत. सध्या आपल्याकडे जिल्ह्यानुसार एमएच व कोड (१३) अशा नंबरप्लेट अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाहन कोणत्या राज्यात नोंदणी झाले आहे, हे ओळखता येते.

बीएच सिरीजसाठी काय करावे लागणार

१बीएच सिरीजमध्ये जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकीचा नंबर हवा असेल तर आरटीओच्या वाहन वेबसाइटवर डीलरकडून ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. वाहनाच्या किमतीवरून आरटीओ कार्यालयाकडून कर आकारला जाईल.

२ पत्त्याच्या पुराव्यासाठी पॅन, आधार, बँक पासबुक याबरोबरच केंद्रीय कर्मचारी असल्याचे संबंधित खात्याने दिलेले ओळखपत्र जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ६० नंबर फॉर्म भरणे बंधनकारक आहे. यावर संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याची सही व शिक्का आवश्यक आहे.

आरटीओ कार्यालयात सुरू झाली नोंदणी

बीएच वाहन क्रमांकासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाहन विक्रेत्यांकडूनच कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाणार आहे. ज्यांना हा क्रमांक हवा असेल त्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आरटीओ कार्यालयाकडून अर्जाबाबत खातरजमा केली जाईल. त्यानंतर संबंधितांना भारत या सिरीजमधून क्रमांक दिला जाईल. कोणत्याही राज्यात गेल्यावर हाच क्रमांक कायम राहणार आहे.

वनटाइम टॅक्स भरता येणार

बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी केल्यावर पंधरा वर्षांसाठी टॅक्स भरावा लागणार आहे. महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर हा नंबर किंवा दुसऱ्या आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. एमएच १३ अशी नोंद असलेल्यांना कर्नाटकात राहावयास गेल्यावर नंबर बदलून घ्यावा लागतो, अन्यथा वाहतूक पोलीस वाहन अडवू शकतात.

केंद्रीय कर्मचारी व तीन राज्यांत कार्पोरेट बिझनेस असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएच सिरीजमधून वाहनांना नंबर घेता येणार आहे. बदली कर्मचाऱ्यांना दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहन पुनर्नोंदणीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी केंद्रीय परिवहन विभागाने ही सोय केली असून, या सिरीजमध्ये नाेंदणी सुरू झाली आहे.

- अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस