शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:00 IST

६० नंबर फॉर्म भरा : इतर राज्यांत गेला तरी टॅक्सची नाही कटकट

सोलापूर : आरटीओकडून वाहनांसाठी भारत (बीएच) या नावाने क्रमांकांची सिरीज सुरू करण्यात आली आहे. हा नंबर घेतल्यानंतर राज्यात कुठेही राहण्यास गेल्यावर नंबर बदलण्याची गरज नाही व त्या राज्याचा टॅक्सही भरायची कटकट राहिलेली नाही; पण असा नंबर घेण्यासाठी ६० नंबरचा अर्ज भरावा लागणार आहे.

केंद्रीय कर्मचारी व ज्या खासगी कंपन्यांची तीन राज्यांत कार्पोरेट कार्यालय आहेत अशांच्या वाहनांसाठी बीएच नावाने सुरू होणारा नंबर मिळणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहने खाजगी व परिवहन संवर्गात नोंदणी करताना एकदाच टॅक्स भरावा लागणार आहे. रेल्वे, टपाल, दूरसंचार, लष्कर, केंद्रीय राखीव बल, सीमा सुरक्षा बल, नेव्ही, राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलून गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलावी लागते. यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी वाहन नोंदणी केली आहे, त्या कार्यालयातून ट्रान्सफरचा अर्ज सादर करून आरटीओची एनओसी घ्यावी लागते. यासाठी संबंधित पोलिसांचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. उर्वरित टॅक्स रिटर्न घेऊन ज्या राज्यात जावे लागते, तेथील टॅक्स भरून वाहनांची नोंदणी करावी लागते; पण आता बीएच सिरीजमध्ये एकदा नंबर घेतल्यावर देशात कोणत्याही राज्यात गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलाची गरज नाही.

असा असतो हा नंबर

बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला गाडीच्या नोंदणीचे वर्ष, त्यानंतर बीएच व गाडीला मिळालेला क्रमांक आणि शेवटी वाहनाच्या नंबरच्या सिरीजची मुळाक्षरे असणार आहेत. सध्या आपल्याकडे जिल्ह्यानुसार एमएच व कोड (१३) अशा नंबरप्लेट अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाहन कोणत्या राज्यात नोंदणी झाले आहे, हे ओळखता येते.

बीएच सिरीजसाठी काय करावे लागणार

१बीएच सिरीजमध्ये जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकीचा नंबर हवा असेल तर आरटीओच्या वाहन वेबसाइटवर डीलरकडून ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. वाहनाच्या किमतीवरून आरटीओ कार्यालयाकडून कर आकारला जाईल.

२ पत्त्याच्या पुराव्यासाठी पॅन, आधार, बँक पासबुक याबरोबरच केंद्रीय कर्मचारी असल्याचे संबंधित खात्याने दिलेले ओळखपत्र जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ६० नंबर फॉर्म भरणे बंधनकारक आहे. यावर संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याची सही व शिक्का आवश्यक आहे.

आरटीओ कार्यालयात सुरू झाली नोंदणी

बीएच वाहन क्रमांकासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाहन विक्रेत्यांकडूनच कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाणार आहे. ज्यांना हा क्रमांक हवा असेल त्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आरटीओ कार्यालयाकडून अर्जाबाबत खातरजमा केली जाईल. त्यानंतर संबंधितांना भारत या सिरीजमधून क्रमांक दिला जाईल. कोणत्याही राज्यात गेल्यावर हाच क्रमांक कायम राहणार आहे.

वनटाइम टॅक्स भरता येणार

बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी केल्यावर पंधरा वर्षांसाठी टॅक्स भरावा लागणार आहे. महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर हा नंबर किंवा दुसऱ्या आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. एमएच १३ अशी नोंद असलेल्यांना कर्नाटकात राहावयास गेल्यावर नंबर बदलून घ्यावा लागतो, अन्यथा वाहतूक पोलीस वाहन अडवू शकतात.

केंद्रीय कर्मचारी व तीन राज्यांत कार्पोरेट बिझनेस असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएच सिरीजमधून वाहनांना नंबर घेता येणार आहे. बदली कर्मचाऱ्यांना दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहन पुनर्नोंदणीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी केंद्रीय परिवहन विभागाने ही सोय केली असून, या सिरीजमध्ये नाेंदणी सुरू झाली आहे.

- अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस