शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता; आरटीओत मिळतो असा नंबर की ती गाडी कोणीच नाही अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:00 IST

६० नंबर फॉर्म भरा : इतर राज्यांत गेला तरी टॅक्सची नाही कटकट

सोलापूर : आरटीओकडून वाहनांसाठी भारत (बीएच) या नावाने क्रमांकांची सिरीज सुरू करण्यात आली आहे. हा नंबर घेतल्यानंतर राज्यात कुठेही राहण्यास गेल्यावर नंबर बदलण्याची गरज नाही व त्या राज्याचा टॅक्सही भरायची कटकट राहिलेली नाही; पण असा नंबर घेण्यासाठी ६० नंबरचा अर्ज भरावा लागणार आहे.

केंद्रीय कर्मचारी व ज्या खासगी कंपन्यांची तीन राज्यांत कार्पोरेट कार्यालय आहेत अशांच्या वाहनांसाठी बीएच नावाने सुरू होणारा नंबर मिळणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहने खाजगी व परिवहन संवर्गात नोंदणी करताना एकदाच टॅक्स भरावा लागणार आहे. रेल्वे, टपाल, दूरसंचार, लष्कर, केंद्रीय राखीव बल, सीमा सुरक्षा बल, नेव्ही, राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलून गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलावी लागते. यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी वाहन नोंदणी केली आहे, त्या कार्यालयातून ट्रान्सफरचा अर्ज सादर करून आरटीओची एनओसी घ्यावी लागते. यासाठी संबंधित पोलिसांचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. उर्वरित टॅक्स रिटर्न घेऊन ज्या राज्यात जावे लागते, तेथील टॅक्स भरून वाहनांची नोंदणी करावी लागते; पण आता बीएच सिरीजमध्ये एकदा नंबर घेतल्यावर देशात कोणत्याही राज्यात गेल्यावर वाहनांची नोंदणी बदलाची गरज नाही.

असा असतो हा नंबर

बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला गाडीच्या नोंदणीचे वर्ष, त्यानंतर बीएच व गाडीला मिळालेला क्रमांक आणि शेवटी वाहनाच्या नंबरच्या सिरीजची मुळाक्षरे असणार आहेत. सध्या आपल्याकडे जिल्ह्यानुसार एमएच व कोड (१३) अशा नंबरप्लेट अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाहन कोणत्या राज्यात नोंदणी झाले आहे, हे ओळखता येते.

बीएच सिरीजसाठी काय करावे लागणार

१बीएच सिरीजमध्ये जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकीचा नंबर हवा असेल तर आरटीओच्या वाहन वेबसाइटवर डीलरकडून ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. वाहनाच्या किमतीवरून आरटीओ कार्यालयाकडून कर आकारला जाईल.

२ पत्त्याच्या पुराव्यासाठी पॅन, आधार, बँक पासबुक याबरोबरच केंद्रीय कर्मचारी असल्याचे संबंधित खात्याने दिलेले ओळखपत्र जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ६० नंबर फॉर्म भरणे बंधनकारक आहे. यावर संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याची सही व शिक्का आवश्यक आहे.

आरटीओ कार्यालयात सुरू झाली नोंदणी

बीएच वाहन क्रमांकासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाहन विक्रेत्यांकडूनच कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाणार आहे. ज्यांना हा क्रमांक हवा असेल त्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आरटीओ कार्यालयाकडून अर्जाबाबत खातरजमा केली जाईल. त्यानंतर संबंधितांना भारत या सिरीजमधून क्रमांक दिला जाईल. कोणत्याही राज्यात गेल्यावर हाच क्रमांक कायम राहणार आहे.

वनटाइम टॅक्स भरता येणार

बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी केल्यावर पंधरा वर्षांसाठी टॅक्स भरावा लागणार आहे. महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर हा नंबर किंवा दुसऱ्या आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. एमएच १३ अशी नोंद असलेल्यांना कर्नाटकात राहावयास गेल्यावर नंबर बदलून घ्यावा लागतो, अन्यथा वाहतूक पोलीस वाहन अडवू शकतात.

केंद्रीय कर्मचारी व तीन राज्यांत कार्पोरेट बिझनेस असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएच सिरीजमधून वाहनांना नंबर घेता येणार आहे. बदली कर्मचाऱ्यांना दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहन पुनर्नोंदणीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी केंद्रीय परिवहन विभागाने ही सोय केली असून, या सिरीजमध्ये नाेंदणी सुरू झाली आहे.

- अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस