शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... ओक्के मदी सगळं; शहाजीबापूंच्या ‘डोंगार’मुळे माणदेशी बोली जगभर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:33 IST

शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं.

रवींद्र देशमुख -

सोलापूर: अहो, चर्चा तर होणारच! सांगोल्याच्या शहाजीबापूंनी जणू गुवाहाटीचं ‘डोंगार’च सर केलंय... माणदेशसारख्या कोरड्या भागातून आलेेल्या या शिवसेनेच्या रांगड्या आमदारानं आपल्या माणबोलीतून आसामची हिरवाई जगभर पोहोचवली... यानिमित्ताने ‘गदिमा’, व्यंकटेश माडगूळकर या दिग्गज लेखकांनी अक्षरवैभव दिलेल्या माणदेशी भाषेची चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातील आर्ची ठसक्यात म्हणाली होती ना..‘मराठीत कळत नाय, तर इंग्लिशमध्ये सांगू का?’ ही करमाळा भागातील भाषा देशभर पोहोचली; पण शहाजीबापूंनी तर माणबोली जगभर पोहोचवली.शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं. त्यांच्या त्या संवादाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जसा माणदेशी रांगडेपणा उमजला तसं बंडामागचं खरं खरं कारणही मराठी जनतेला उमजलं. जशी ही ऑडिओ क्लिप जगभर गेली, तसे शहाजीबापूही गाजले.सोशल मीडियावर जिकडे पाहावे तिकडे ‘काय झाडं, काय डोंगार...‘ओके’मध्ये आहे’ हे त्यांच्या संवादाचं पहिलं वाक्य अनेकांच्या वॉलवर झळकू लागलं. अनेक यू-ट्यूबर पत्रकारांनी बापूंच्या या ऑडिओमधील कन्टेन्टचा आधार घेऊन सध्याच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ केेले. हजारोंच्या संख्येने लाईक्स अन् व्ह्यूज या व्हिडिओंना मिळत आहेत.शहाजीबापू ज्या भागातून आलेत तो माणदेश हा सातारा, सांगली अन् सोलापूर जिल्ह्यातील माण नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. पाण्याअभावी आलेला कोरडेपणा येथील माणसांच्या स्वभावात व भाषेवरही दिसून येतो. माणदेशी बोली जितकी रांगडी तितकीच आपुलकीची अन् प्रांजळ... 

तिथली रम्यता भावली असेल!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा इंगोले यांनी शहाजीबापू पाटील यांच्या संवादातील भाषा अन् भाव याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विवेचन केले. ते म्हणाले की, आमदारांचं अवघं आयुष्य माणदेशातील कोरड्या प्रदेशात गेलं. त्यांना तिथले डोंगर, झाडे आणि एकूणच रम्यता भावली. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यातून आले. इथल्या भूप्रदेशाचा, वातावरणाचा परिणामही माणसाच्या वागण्या-बोलण्यात आलेला आहे. त्यामुळे भाषेचा लहेजा वेगळा वाटतो. माणदेशी बोलीभाषा इथल्या ग्रामीण महिलांमध्ये अधिक जाणवते. ‘वरलीकडून आला’, ‘खाललीकडं गेला’ अशी बोली सर्रास ऐकायला मिळते. माणदेशी बोलीवर सध्या संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाषेचा गौरव झाला!सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शहाजीबापूंच्या बोलीची प्रशंसा केली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मुळे करमाळा, जेऊरची भाषा देशभर पोहोचली. बापूंच्या मोबाईलवरील संवादामुळे बऱ्याच काळानंतर आमच्या भाषेला उजळणी मिळाली..या निमित्ताने सोलापुरी भाषेला गौरव प्राप्त झाला आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेhotelहॉटेल