शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 15:39 IST

सोलापुरातल्या उद्योजकांच्या भावना; आम्ही लढू. नवे नियोजन करू...!!

ठळक मुद्देलॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतीलउद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेलभविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे

बाळकृष्ण दोड्डी

 सोलापूर : लॉकडाऊन काळात उद्योगधंदे पूर्णपणे थांबले आहेत. लॉकडाऊन कधी उठेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग पूर्वपदावर यायला किमान एक वर्षभराचा कालावधी लागेल. आम्ही यातून शंभर टक्के बाहेर पडणे मुश्कील आहे. पण उद्योजक हिंमत हरणार नाहीत. आम्ही लढू. नवे नियोजन करू. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील काळात उद्योगासाठी मदतीचे धोरण हवे आहे, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

 लॉकडाऊन नंतर येणाºया अडचणींचा सामना करण्याचा निर्धार सोलापुरातील उद्योजकांनी केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्योजकांनी ह्यलोकमतह्णकडे त्यांचा निर्धार व्यक्त केला आहे. एलएचपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणाले, आमचे पुरवठादार संपूर्ण देशभरात आहेत. या पुरवठादारांवरच आमची उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते. पुरवठासाखळी सुरळीत होण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था हवी आहे. सप्लाय चेन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच कंपनीत नॉर्मल वर्किंग होण्याकरिता अनेक आव्हाने, अडथळे येतील. यातून आम्ही शंभर टक्के नियोजनरित्या बाहेर पडणे मुश्कील आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योजकांना बसणार आहे. अनेक उद्योग बंद पडतील. शेकडो उद्योगाची क्षमता कमी होईल. अनेकांच्या नोकºया जातील. उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्याकरिता याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्योगाच्या मदतीकरिता धोरण आखणे गरजेचे आहे. सरकारी मदत मिळाल्याशिवाय उद्योग पूर्वपदावर येणार नाही. आमच्या प्रयत्नशीलतेला तसेच नियोजनाला सरकारी मदत अपेक्षित आहे. मदत मिळाल्यास आम्ही शंभर टक्के वर्षभरात बाहेर पडू. आमची तयारी आहे.

बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी सांगतात, सध्या आमचा उद्योग सुरू आहे. लॉक डाऊननंतर उद्योग १00 टक्के पूर्वपदावर येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही लॉकडाऊन नंतरही आवश्यक ती काळजी घेत आहोत. 

फॅक्टरीत फिजिकल डिस्टन्स तसेच नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणार आहोत. कर्मचाºयांना योग्य समुपदेशन होईल. सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत राहील. तसेच शासनाकडून उद्योगपूरक धोरण आखणे गरजेचे आहे.

कामगारांना नुकसानभरपाई द्यायला उद्योजकांकडे पैसे नाहीतसोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, लॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतील. उद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेल. भविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे. दीड महिना उद्योग बंद राहिल्याने उद्योजकांचा आर्थिक कणा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टेक्स्टाईल उद्योगात ४0 हजारांहून अधिक कामगार आहेत. या सर्व कामगारांना टेक्स्टाईल उद्योजकांकडून ८ दिवसातून एकदा पाचशे ते हजार रुपये अनामत रक्कम दिली जात आहे. उद्योग सुरळीत झाल्यानंतर दिलेल्या अनामत रकमेची कपात करण्यात येणार आहे. कामगारांना नुकसानभरपाई द्यायला सोलापुरातील उद्योजकांकडे पैसे नाहीत. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस