शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 15:39 IST

सोलापुरातल्या उद्योजकांच्या भावना; आम्ही लढू. नवे नियोजन करू...!!

ठळक मुद्देलॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतीलउद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेलभविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे

बाळकृष्ण दोड्डी

 सोलापूर : लॉकडाऊन काळात उद्योगधंदे पूर्णपणे थांबले आहेत. लॉकडाऊन कधी उठेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग पूर्वपदावर यायला किमान एक वर्षभराचा कालावधी लागेल. आम्ही यातून शंभर टक्के बाहेर पडणे मुश्कील आहे. पण उद्योजक हिंमत हरणार नाहीत. आम्ही लढू. नवे नियोजन करू. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील काळात उद्योगासाठी मदतीचे धोरण हवे आहे, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

 लॉकडाऊन नंतर येणाºया अडचणींचा सामना करण्याचा निर्धार सोलापुरातील उद्योजकांनी केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्योजकांनी ह्यलोकमतह्णकडे त्यांचा निर्धार व्यक्त केला आहे. एलएचपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणाले, आमचे पुरवठादार संपूर्ण देशभरात आहेत. या पुरवठादारांवरच आमची उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते. पुरवठासाखळी सुरळीत होण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था हवी आहे. सप्लाय चेन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच कंपनीत नॉर्मल वर्किंग होण्याकरिता अनेक आव्हाने, अडथळे येतील. यातून आम्ही शंभर टक्के नियोजनरित्या बाहेर पडणे मुश्कील आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योजकांना बसणार आहे. अनेक उद्योग बंद पडतील. शेकडो उद्योगाची क्षमता कमी होईल. अनेकांच्या नोकºया जातील. उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्याकरिता याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्योगाच्या मदतीकरिता धोरण आखणे गरजेचे आहे. सरकारी मदत मिळाल्याशिवाय उद्योग पूर्वपदावर येणार नाही. आमच्या प्रयत्नशीलतेला तसेच नियोजनाला सरकारी मदत अपेक्षित आहे. मदत मिळाल्यास आम्ही शंभर टक्के वर्षभरात बाहेर पडू. आमची तयारी आहे.

बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी सांगतात, सध्या आमचा उद्योग सुरू आहे. लॉक डाऊननंतर उद्योग १00 टक्के पूर्वपदावर येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही लॉकडाऊन नंतरही आवश्यक ती काळजी घेत आहोत. 

फॅक्टरीत फिजिकल डिस्टन्स तसेच नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणार आहोत. कर्मचाºयांना योग्य समुपदेशन होईल. सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत राहील. तसेच शासनाकडून उद्योगपूरक धोरण आखणे गरजेचे आहे.

कामगारांना नुकसानभरपाई द्यायला उद्योजकांकडे पैसे नाहीतसोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, लॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतील. उद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेल. भविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे. दीड महिना उद्योग बंद राहिल्याने उद्योजकांचा आर्थिक कणा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टेक्स्टाईल उद्योगात ४0 हजारांहून अधिक कामगार आहेत. या सर्व कामगारांना टेक्स्टाईल उद्योजकांकडून ८ दिवसातून एकदा पाचशे ते हजार रुपये अनामत रक्कम दिली जात आहे. उद्योग सुरळीत झाल्यानंतर दिलेल्या अनामत रकमेची कपात करण्यात येणार आहे. कामगारांना नुकसानभरपाई द्यायला सोलापुरातील उद्योजकांकडे पैसे नाहीत. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस