शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:55 IST

चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला.

ठळक मुद्देशहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामानपाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकटऔज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत सोलापुरात पावसाळी वातावरण असले तरी आता चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला आहे. 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया भीमा नदीतील औज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले आहे. आता टाकळी पंपगृहासाठी कार्यरत असलेल्या चिंचपूर बंधाºयातील जॅकवेलजवळ सोमवारी ८ इंच पाणी होते. उजनी धरणातून सोलापूरसाठी १९ मे रोजी पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी हे पाणी पुळूज बंधाºयापर्यंत पोहोचले आहे.

सहा बंधारे व ९0 किलोमीटरचा प्रवास आणखी असल्याने औज बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी पंपगृहातील केवळ दोन पंप चालवून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आल्याने आठवडाभर निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी ५ जूनपासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चिंचपूर बंधाºयात पाणी आल्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

शहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामान आहे. त्यामुळे पाण्याची मागणी घटली आहे. अशात उन्हाचा कडाका वाढल्यास नागरिकांची अडचण होणार आहे. पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकट कोसळले आहे, असा आरोप नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरणाºया संंबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी