शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:55 IST

चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला.

ठळक मुद्देशहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामानपाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकटऔज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत सोलापुरात पावसाळी वातावरण असले तरी आता चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला आहे. 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया भीमा नदीतील औज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले आहे. आता टाकळी पंपगृहासाठी कार्यरत असलेल्या चिंचपूर बंधाºयातील जॅकवेलजवळ सोमवारी ८ इंच पाणी होते. उजनी धरणातून सोलापूरसाठी १९ मे रोजी पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी हे पाणी पुळूज बंधाºयापर्यंत पोहोचले आहे.

सहा बंधारे व ९0 किलोमीटरचा प्रवास आणखी असल्याने औज बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी पंपगृहातील केवळ दोन पंप चालवून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आल्याने आठवडाभर निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी ५ जूनपासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चिंचपूर बंधाºयात पाणी आल्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

शहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामान आहे. त्यामुळे पाण्याची मागणी घटली आहे. अशात उन्हाचा कडाका वाढल्यास नागरिकांची अडचण होणार आहे. पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकट कोसळले आहे, असा आरोप नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरणाºया संंबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी