शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:55 IST

चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला.

ठळक मुद्देशहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामानपाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकटऔज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत सोलापुरात पावसाळी वातावरण असले तरी आता चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला आहे. 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया भीमा नदीतील औज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले आहे. आता टाकळी पंपगृहासाठी कार्यरत असलेल्या चिंचपूर बंधाºयातील जॅकवेलजवळ सोमवारी ८ इंच पाणी होते. उजनी धरणातून सोलापूरसाठी १९ मे रोजी पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी हे पाणी पुळूज बंधाºयापर्यंत पोहोचले आहे.

सहा बंधारे व ९0 किलोमीटरचा प्रवास आणखी असल्याने औज बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी पंपगृहातील केवळ दोन पंप चालवून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आल्याने आठवडाभर निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी ५ जूनपासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चिंचपूर बंधाºयात पाणी आल्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

शहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामान आहे. त्यामुळे पाण्याची मागणी घटली आहे. अशात उन्हाचा कडाका वाढल्यास नागरिकांची अडचण होणार आहे. पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकट कोसळले आहे, असा आरोप नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरणाºया संंबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी