शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सोलापुरात पाच दिवस नव्हे सहा दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:03 IST

महापालिकेकडून वीज गायब झाल्याचे कारण; ऐन सदासदीत नागरिकांची तारांबळ

ठळक मुद्देशहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहेमहापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेतऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नागरिक नाराजी

सोलापूर  :  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात धो-धो पाऊस कोसळत आहे; मात्र महापालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. उजनी पंपगृहातील बिघाडामुळे शहरात पाच दिवसाआड पाणी सुरू होते. आता पुन्हा गुरुवारी वीज गायब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात सहा दिवसाआड पाणी येणार आहे. 

टाकळी पंपगृहाला होणारा विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला खंडित झाला. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे टाकळी आणि सोरेगाव योजनेत पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही. शुक्रवारी आणि शनिवारी शहरात कमी दाबाने पाणी येणार आहे.

मागील आठवड्यात उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण देऊन चार दिवसांऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाच दिवसांचे आवर्तन अद्याप पूर्ण होत नाही तोच आता टाकळी योजनेतील वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण दिले जात आहे. या बिघाडामुळे आणखी एक दिवस पाणी उशिरा येणार आहे. शहरात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवित आहेत. वीज वितरण कंपनी सुरळीत वीजपुरवठा करीत नाहीत. बिघाड दुरुस्त करायला उशीर लावतात, असा आरोपही हे अधिकारी करीत आहेत. 

अधिकाºयांचा कानाडोळा- शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहे. महापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे या तक्रारींकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. उन्हाळ्याच्या सुुरुवातीला शहरात व्यवस्थित चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पण ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात