शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:10 IST

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतलापर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेलीउजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.

जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत मोजणी केली जाते. वर्षातून जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोबर असे चार वेळा पाणीपातळी मोजून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. यावरच पाणी नियोजन केले जाते. मे महिन्यात पाऊस पडण्याअगोदर व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडल्यानंतर मोजणी केलेली पाणीपातळी महत्त्वाची समजली जाते. यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने वरिष्ठ भू- वैज्ञानिक कार्यालयाच्या पाणीपातळी अहवालावर प्रशासनाला पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा विचार केला असता  सरासरीआॅक्टोबर महिन्यात ४.४२ मीटर पाणीपातळी होती. यावर्षीची आॅक्टोबर महिन्यात निरीक्षण विहिरींची पाणीपातळी ६.७० मीटर खाली गेली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेचा विचार केला असता यावर्षी २.२८ मीटरने पाणीपातळी खोलवर गेली आहे.

बार्शी तालुक्यात ६१ टक्के, माळशिरस तालुक्यात ४८ टक्के, दक्षिण तालुक्यात ४२ टक्के, सांगोला व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी ४१ टक्के, मोहोळ तालुक्यात ४० टक्के, उत्तर सोलापूर तालुक्यात ३९ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ३७ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३६ टक्के, माढा तालुक्यात ३२ तर करमाळा तालुक्यात २८ टक्के पाऊस पडला आहे. 

सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा- मागील वर्षी आॅक्टोबर महिन्याची पाणीपातळी वरती (अधिक) आली होती. यावर्षी मात्र सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा झाली आहे. २०१७ मध्ये(जून ते सप्टेंबर) ४८८.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होता, प्रत्यक्षात ४१५.३ मि.मी. तर ८५ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना १९९.०२ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.

यावर्षी पर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सरासरी ४० टक्के पाऊस पडल्याची नोंद असली तरी अनेक भागात यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. आमचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.- मुश्ताक शेख, वरिष्ठ भू-वैज्ञानिक सोलापूर 

उजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर आहेत. लहान-मोठे तलावही कोरडे आहेत. आता पशुधन जगविणे व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उजनी धरण भरले असले तरी सर्वांना पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची गरज आहे.- राजन पाटील, माजी आमदार, सोलापूर 

जिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. या १०० गावांतील पिकांची परिस्थिती आॅनलाईन भरण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उद्या(रविवारी) करणार आहेत. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Solapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती