शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जलयुक्तमध्ये नियम शिथिलचे अधिकार जिल्हाधिकाºयांना, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सोलापूरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:30 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत

ठळक मुद्देकामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतीलदेवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुं

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत, पाणी अडविण्याची कामे घेण्याची मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतील असे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उत्तर सोलापूर तालुक्यातील जलयुक्तच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. राज्यात मागील काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची गरज निर्माण झाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण झाले. अनेक ठिकाणी बंधाºयांची कामे झाली. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. याचा परिणाम शिवारात पडलेले पाणी शिवारातच अडण्यामध्ये झाला. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वरती आल्याने राज्यभरातून या कामांना मागणी वाढली असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये किंवा जलयुक्तमध्ये समावेश नसलेल्या गावात सिमेंट बंधारा व पाणी अडविण्याची कामे करण्यासाठी नियमावली असली तरी दोन बंधाºयातील अंतरासाठी किंवा अन्य कामासाठी तांत्रिक अडचणीमुळे कामे मंजूर होत नसतील परंतु अशी कामे होणे गरजेचे वाटत असेल तर ती मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये एखादे गाव नसेल तरीही आवश्यक असलेल्या गावात कामे नियमित योजनेतून करण्यात येतील असेही जलसंधारण मंत्र्यांनी सांगितले.-------------कामामुळे झालेल्या बदलाचा अहवाल...जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे अनेक गावात आजही पाणी वाहताना दिसत आहे. जे ओढे बंद होते ते वाहते झाले आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने अशा ठिकाणी शेती पिकांचे वाढलेले उत्पन्न व झालेल्या बदलाच्या परिणामाचे अहवाल तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRam Shindeप्रा. राम शिंदे