शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जलयुक्तमध्ये नियम शिथिलचे अधिकार जिल्हाधिकाºयांना, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सोलापूरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:30 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत

ठळक मुद्देकामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतीलदेवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुं

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत, पाणी अडविण्याची कामे घेण्याची मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतील असे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उत्तर सोलापूर तालुक्यातील जलयुक्तच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. राज्यात मागील काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची गरज निर्माण झाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण झाले. अनेक ठिकाणी बंधाºयांची कामे झाली. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. याचा परिणाम शिवारात पडलेले पाणी शिवारातच अडण्यामध्ये झाला. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वरती आल्याने राज्यभरातून या कामांना मागणी वाढली असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये किंवा जलयुक्तमध्ये समावेश नसलेल्या गावात सिमेंट बंधारा व पाणी अडविण्याची कामे करण्यासाठी नियमावली असली तरी दोन बंधाºयातील अंतरासाठी किंवा अन्य कामासाठी तांत्रिक अडचणीमुळे कामे मंजूर होत नसतील परंतु अशी कामे होणे गरजेचे वाटत असेल तर ती मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये एखादे गाव नसेल तरीही आवश्यक असलेल्या गावात कामे नियमित योजनेतून करण्यात येतील असेही जलसंधारण मंत्र्यांनी सांगितले.-------------कामामुळे झालेल्या बदलाचा अहवाल...जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे अनेक गावात आजही पाणी वाहताना दिसत आहे. जे ओढे बंद होते ते वाहते झाले आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने अशा ठिकाणी शेती पिकांचे वाढलेले उत्पन्न व झालेल्या बदलाच्या परिणामाचे अहवाल तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRam Shindeप्रा. राम शिंदे