शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मोडनिंबमध्ये पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 14, 2014 01:30 IST

बांगड्या आणल्या; ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी मांडला ठिय्या

 

मोडनिंब : मोडनिंब शहराला गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. याबाबत शहरातील सुमारे ४० महिलांनी हातात रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सरपंच नवनाथ मोहिते यांच्या टेबलसमोर उभ्या राहून आमच्या पाण्याची सोय करा म्हणून जोरदार मागणी केली. हे नाट्य तब्बल तासभर चालू होते. अखेर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन सरपंच मोहिते यांनी दिल्यानंतर महिला शांत झाल्या. मंगळवारी सकाळी ११ वाजता सरपंच नवनाथ मोहिते, सदस्य शिवाजी सुर्वे, उदय जाधव, दत्ता सुर्वे, चांगदेव वरवडे, किरण खडके हे ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करीत बसलेले होते. अचानक कमल सिरसट, अनुसया साळुंखे, रोहिणी दीक्षित, नंदा कुंभार, बेबीजान कोरबू, काशीबाई मस्के, नंदा व्यवहारे, रतन शिंदे, सोना लोंढे, शांताबाई पाटील, शालन देवळे, गीता कुंभार, सुमन कुंभार, साखरबाई शेंडगे, मंदा जाधव, चंदा जाधव, सुलोचना खडके, आनंदीबाई पिसे, शामल महामुनी, शोभा काळे, अश्विनी खडके, सुवर्णा निकम, अनिता भालेराव या महिला हातात रिकाम्या घागरी घेऊन आल्या आणि जोरदार घोषणाबाजी करु लागल्या. या महिलांनी सरपंच व सदस्यांना धारेवर धरले. आम्ही दररोज २०० लिटर पाणी ३० रुपयांना विकत घेत असल्याचे सांगितले. यावर सदस्य शिवाजी सुर्वे म्हणाले की, विकत पाणी घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मात्र ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरली तर थकीत वीज बिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करता येईल. यावेळी प्रशांत गिड्डे, नितीन गडधरे, सुनील ओहोळ, सुरेश लोंढे, फिरोज मुजावर, बंडू सुतार आदी उपस्थित होते.

---------------------------

यात्रेतही पाण्याचे हाल ४ सध्या मोडनिंबचे ग्रामदैवत वेताळ देवस्थानची यात्रा सुरू आहे. मात्र आंघोळीसाठी पाणीच नसल्याने नागरिकांसह आलेल्या पाहुण्यांचेही हाल सुरू आहेत

. ------------------

तर तुमच्यासाठी बांगड्या ४ तुम्हाला जर वेळेवर पाणीपुरवठा करता येत नसेल व स्वच्छतेकडे लक्ष देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा, अन्यथा या बांगड्या तुमच्यासाठी आणल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शोभा शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

--------------------------

सरपंचाच्या वॉर्डात पाणी ४ सरपंच नवनाथ मोहिते यांच्या प्रभाग चारमधील आदर्शनगर येथे पाच बोअर असून, विद्युत पंपाद्वारे सर्वांना दररोज मुबलक पाणी मिळत आहे. याच वॉर्डातील वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे सरपंचाच्या वॉर्डात पाणीटंचाई नाही, असे चित्र मोडनिंबमध्ये सध्या दिसत आहे.