शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली

By appasaheb.patil | Updated: March 28, 2023 14:36 IST

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले. ऐन उन्हाळ्यात औज बंधाऱ्यात पाणी आल्याने शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सध्या तरी उद्भवणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. औज परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यासंदर्भात आयुक्तांनी विजयपूर व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोलापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून औज धरणासाठी पाणी सोडले होते. ते पाणी सोमवारी औजमध्ये पोहोचले. एकीकडे शहरात सहा-सहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. उजनी धरणातून सोलापूरपर्यंत पाणी येईपर्यंत ६७ पाणीपुरवठा योजना आहेत, या योजनांतही ते पाणी जात असल्याचेही सांगण्यात आले. या पाण्यामुळे पाणीटंचाई मिटणार असून, सुरळीत व मुबलक होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, त्यामुळे मेनंतर सोलापुरात पाणीटंचाई भासणार असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ujine Damउजनी धरण