शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

By admin | Updated: March 16, 2017 18:30 IST

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लकविजयपूर : जिल्ह्यातील आलमट्टी धरण कृष्णा नदीवरील १२३ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या व मागील वर्षाच्या पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयात सध्या केवळ १७ टीएमसी इतकाच मृतवत पाण्याचा साठा असल्याने यावर्षी बागलकोट, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांना अभूतपूर्व अशा तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन विजयपूर पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.आलमट्टी जलाशयाची उंची ५०६ मीटर इतकी आहे. वास्तविक पाहता आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मे महिन्यामध्ये मृतवत साठ्यापर्यंत जातो. पावसाचा अभाव, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरणारे पाणी, विविध प्रकारच्या पिकासाठी जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याचा वापर व आलमट्टी जलशयातून शेजारच्या राज्यात सोडण्यात आलेले पाणी आदी कारणामुळे आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मार्चच्या पंधरवड्यात मृतवत अवस्थेत गेलेला आहे. सध्या आलमट्टी जलाशयात केवळ १७ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी परेसा आहे. परंतु, जलसिंचनासाठी आता पाणी सोडता येणार नसल्याचे कृष्णाभाग्य जलनियम लि. च्या एका अभियंत्याने सांगितले. आलमट्टीजलाशयांमध्ये जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा आहे. मात्र भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.-----------------------------------------------                                                                                                                 विजयपुरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीविजयपुर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. सध्या काही भागात पाच दिवसाआड आणि काही भागात सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे विजयपुर शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हेस्कॉमकडून भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात येत असल्याने खोदाई करताना जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. विजयपुर शहरातील प्रत्येक रस्त्यावर गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र काही भागात पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. फुटलेल्या जलवाहिनीद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.