शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

By admin | Updated: March 16, 2017 18:30 IST

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लकविजयपूर : जिल्ह्यातील आलमट्टी धरण कृष्णा नदीवरील १२३ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या व मागील वर्षाच्या पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयात सध्या केवळ १७ टीएमसी इतकाच मृतवत पाण्याचा साठा असल्याने यावर्षी बागलकोट, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांना अभूतपूर्व अशा तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन विजयपूर पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.आलमट्टी जलाशयाची उंची ५०६ मीटर इतकी आहे. वास्तविक पाहता आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मे महिन्यामध्ये मृतवत साठ्यापर्यंत जातो. पावसाचा अभाव, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरणारे पाणी, विविध प्रकारच्या पिकासाठी जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याचा वापर व आलमट्टी जलशयातून शेजारच्या राज्यात सोडण्यात आलेले पाणी आदी कारणामुळे आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मार्चच्या पंधरवड्यात मृतवत अवस्थेत गेलेला आहे. सध्या आलमट्टी जलाशयात केवळ १७ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी परेसा आहे. परंतु, जलसिंचनासाठी आता पाणी सोडता येणार नसल्याचे कृष्णाभाग्य जलनियम लि. च्या एका अभियंत्याने सांगितले. आलमट्टीजलाशयांमध्ये जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा आहे. मात्र भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.-----------------------------------------------                                                                                                                 विजयपुरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीविजयपुर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. सध्या काही भागात पाच दिवसाआड आणि काही भागात सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे विजयपुर शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हेस्कॉमकडून भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात येत असल्याने खोदाई करताना जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. विजयपुर शहरातील प्रत्येक रस्त्यावर गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र काही भागात पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. फुटलेल्या जलवाहिनीद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.