शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बेगमपूर पुलावरील पाणी ओसरू लागले; मंगळवेढा - पंढरपूर महामार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:06 IST

माण नदीवरील पूल खुला, प्रशासनावरचा ताण झाला कमी

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर व सोलापूर या मार्गावर एस.टी बसेस धावू शकली नाहीपूराच्या पाण्याने वेढलेले तामदर्डी गावही रविवारी  मुक्त होणार आहेनदीकाठावरील भागात शिरलेले पाणी ओसरत असून आता दुर्गंधी युक्त वासाने नागरीक त्रस्त

मंगळवेढा : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, यामुळे माचणूर -बेगमपूर पुलावरील पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरू लागले आहे़ रविवारी दुपारी पुलाची राष्ट्रीय महामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे,  वाहतुकीसाठी कोणताही धोका नसल्याबाबत त्याचा अहवाल प्राप्त होताच रविवारी सायंकाळपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सोलापूर-कोल्हापूर हा महामार्ग खुला होण्याची शक्यता  तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, महापूराचे पाणी ओसरल्याने पोलीस व महसूल प्रशावसनावरचा ताण कमी झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उजनी व वीर धरणातून भीमेच्या पात्रात जवळपास तीन ते चार लाख क्युसेक पाणी विसर्ग असल्याने  भीमा नदीला महापूर आला होता. गेले तीन दिवस भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे़ बेगमपूर येथील पुलावर पहिल्यांदाच पाच फुटापेक्षा जास्त पाणी वाहिले यामुळे गेले तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. या दरम्यान एस.टी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवाशांनी कर्नाटक राज्यातून येऊन आपली घरे गाठली. मात्र हत्तुर येथील पुलावरून ही पाणी वाहू लागल्याने झळकीमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या पुलावरील पाणी शनिवार पहाटेपासून कमी होत आहे, तरीही रविवार सकाळपर्यत  पुर्णत: पाणी कमी झाल्यानंतर तात्काळ  राष्ट्रीय माहामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे त्यानंतर चारकी वाहनांना पूलावरून प्रवेश दिला जाणार आहे.  

रविवारी पुलावरील पाणी झाल्यावर तपासणीनंतर  प्रथमत: दहा टन वजनाची मालवाहतूक गाडी सोडण्यात येणार आहे़   तद्नंतर टप्प्याटप्प्याने अनुक्रमे २० ते ५० टन  वजनाची अवजड वाहने सोडली जाणार आहेत . महापूर कालावधीत पूलावरून प्रवेशकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सपोनि किरण उंदरे यांनी नदीच्या दोन्ही काठावर पोलीस व तलाटी यांचे पथके रात्रंदिवस कार्यरत ठेवली आहेत. पूल रिकामा होताच रविवारी सायंकाळपासून मंगळवेढा आगाराने सोलापूर मार्गावर एस.टी बसेस सोडण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत अशी माहिती आगरप्रमुख गुरुनाथ रणे यांनी सांगितले़ दरम्यान सिद्धेवाडी येथील माण नदीवरील पाणी ओसरल्यानंतर मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरसोलापूर या मार्गावर एस.टी बसेस धावू शकली नाही. परिणामी तीन दिवसात या मार्गावरील १०० हुन  फेºया रद्द झाल्या होत्या, याचा अर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पूराच्या पाण्याने वेढलेले तामदर्डी गावही रविवारी  मुक्त होणार आहे. नदीकाठावरील भागात शिरलेले पाणी ओसरत असून आता दुर्गंधी युक्त वासाने नागरीक त्रस्त झाले आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ रोगराई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामधून फवारणी व पावडर टाकणे गरजेचे आहे. सध्या वाहतूक बंद असल्याने विविध राज्यातील शेकडो वाहने खोळंबली आहेत

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरRainपाऊस