शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

दररोज दहा हजार पावले चाला अन् कंबरदुखी, गुडघेदुखी पळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST

सोलापूर : अनेक कारणांमुळे आपली चालण्याची सवय मोडलीय. अन् आपणच आपलं आयुष्य अल्पायुषी करून बसलो आहोत. अकाली वृद्धत्व ...

सोलापूर : अनेक कारणांमुळे आपली चालण्याची सवय मोडलीय. अन् आपणच आपलं आयुष्य अल्पायुषी करून बसलो आहोत. अकाली वृद्धत्व ओढावून बसलो आहोत. मात्र, हे मनापासून टाळायचं असेल, गुडघेदुखी, कंबरदुखी कायम घालवायची असेल अन् मधूमेह, हृदयविकार नॉर्मल ठेवायचं असेल तर मग दररोज दहा हजार पावले चाला, मग बघा हे आजार चुटकीसरशी पळून जातील आणि स्मार्टही दिसाल. हा सल्ला आरोग्य क्षेत्रातील जाणकरांची दिला आहे. अन् ज्यांना एवढं चालणं शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जसं शक्य होईल तसं चाललंच पाहिज. हे मात्र खरं.

अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर पडायचे असल्यास मोटारसायकलशिवाय आपण बाहेर पडत नाही. चालण्याची सवयच मोडली आहे. यामुळे आपसूकच अगदी तरुण वयामध्ये कंबरेच्या वेदना एक सामान्य समस्या झाली आहे. व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे, एकाच जागी खूप वेळ बसून काम करणेसुद्धा याला कारणीभूत आहे.

जेवणाअगोदर व्यायाम करणे हे चांगले. जेवणानंतर कमीत कमी २ तासांनंतर व्यायाम करावा. मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणं गरजेचं आहे. वजन कमी करायचे असल्यास किंवा शरीरातील अतिरिक्त उष्णता जाळायचीअसेल तर रोज सकाळी किमान एक तास तरी वेगाने चाला. यामुळे वजनही कमी होईल. पचनक्रिया सुधारते. हृदयविकाराचा झटका येत नाही. यासाठी एका ठिकाणी एक तास बसू नये. पायांचे स्नायू चालण्यामुळे बळकटी येते. मधुमेह, रक्तदाब नियंत्रित राहतो. एवढे तर आपणास करावं लागेल.

----

एवढेच होते चालणे

- ज्येष्ठ मंडळी डॉक्टरांनी सल्ला दिला म्हणून दररोज सकाळी व्यायाम करतात. सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचा त्रास, मधुमेह, रक्तदाब कमी व्हावी यासाठीच हे चालणे होते. बहुतांश गृहिणी, नोकरवर्ग संध्याकाळी व्यायाम करतात. काही मंडळी तर चालणेच हरवलेले दिसतात. अगदी किरणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा स्टॉपवर जाईपर्यंत एवढेच काय ते यांचे चालणे होते. नोकरवर्ग ऑफिसला अथवा कुठेही बाइकशिवाय जात नाहीत. गाडी पार्क करून फार तर घरात अथवा कार्यालयात जाईपर्यंतच यांचे चालणे होते. मग अकाली व्याधी जडणारच.

----

अहो, म्हणून तर वाढले हे विकार

- गुडघेदुखी, मणक्याचे, पाठीचे आजार, रक्तदाब, मधुमेह, पोटदुखी, जाडी हे विकार चालणे बंद झाल्यामुळे जडले. चालण्यामुळे हाडाची घनता वाढते. आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासाठी चालण्यासारखा उत्तम पर्याय जगात कुठे नाही. सुखी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर या गोष्टी आजपासूनच अमलात आणाव्यात, असा सल्ला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील हंद्राळमठ यांनी दिला.

----

हे करून बघा

- दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे पकडून छातीकडे ओढा. चार ते पाच सेकंद धरून ठेवा. नंतर गुडघे खाली घेऊन सावकाश श्वास घ्या. असे ५ वेळा करा.

-पाठीवर झोपा. पाय सरळ व गुडघे ताठ ठेवा. दोन्ही पायांमध्ये दोन इंचांचे अंतर ठेवा. पाय जमिनीपासून साधारणत: पाच इंच वर उचला आणि दहा सेकंद तरी धरून ठेवा. असे दहा वेळा करा.

- किमान एक किलोमीटर परिसरात जाताना मोटारसायकलचा वापर टाळायला शिका.

- ऑफिस, कार्यालयात चढ-उतार करताना लिफ्टचा वापर टाळा पायऱ्यांचा वापर करा. यामुळे आपल्या स्नायूंना व्यायाम होईल.

-----

चालणे शक्य अशांनी करावे काय?

- ज्यांचे गुडघे पायी चालण्यानंतर दुखतात अशांनी पोहणे आणि सायकलिंग करावी. यामुळे स्नायूंना शारीरिक हालचाली वाढायला हवे. आपल्या शरीराची लवचिकता राहते. किमान २० मिनिटे तरी सायकलिंग करावी. दीर्घायुष्यी जगण्यासाठी पायांच्या स्नायूंना बळकटी येते. यासाठी याचा अंमल करावा.

-----