शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

प्रक्षाळ पूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शिणवटा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 03:48 IST

अनेक वर्षांची परंपरा : केशरयुक्त पाण्याने घातले स्नान; दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू

पंढरपूर (जि़सोलापूर): आषाढी वारी सोहळ्यादरम्यान २४ तास अखंडपणे उभे दर्शन दिल्यामुळे देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान घालण्यात आले़ त्यानंतर, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय रात्री १४ पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, सायंकाळी साडेपाच वाजताचे दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला थकवा येतो, असे मानले जाते. देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी वारी सोहळ्यानंतर मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यानुसार २१ जुलै रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले़प्रक्षाळ पूजा मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक केली. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाºयाला देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़ आजपासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. प्रक्षाळपूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरु झाले. पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता़ गाभाराही फुलांनी सजविण्यात आला होता़

१४ पदार्थांपासून बनविला काढाश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़ हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर