शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आर्यन शुगरच्या हस्तांतरणाची वैधता अबाधित, राऊत यांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 07:55 IST

बार्शी - तालुक्यातील आर्यन शुगरच्या हस्तांतरण व्यवहाराच्या वैधतेस आव्हान देणारी याचिका आमदार राजेंद्र राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली ...

बार्शी - तालुक्यातील आर्यन शुगरच्या हस्तांतरण व्यवहाराच्या वैधतेस आव्हान देणारी याचिका आमदार राजेंद्र राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राजेंद्र राऊत यांना उच्च न्यायालयात माघार घ्यावी लागली आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका  व न्यायमूर्ती व्ही.जी बीशीत  यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेची सुनावणी झाली.

याबाबत माहिती देताना माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले की, आर्यन शुगर कारखान्याचे कायदेशीर हस्तांतरण ५ सप्टेंबर २०१४ ला अविनाश भोसले आणि त्यांच्या इतर संचालक यांच्या हक्कात झाले होते. योगेश सोपल व इतर तत्कालीन संचालकांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेतकऱ्यांची देणी संपूर्ण अदा केली होती. त्यामुळे विद्यमान संचालक अविनाश भोसले यांना गळीत हंगामाची परवानगीदेखील राज्य शासनाकडून घेतली होती, त्याप्रमाणे गाळपदेखील केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या देणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतः भोसले यांनी जबाबदार असल्याचे कबूल केले आहे. ही सर्व वस्तुस्थिती असताना राऊत यांनी राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करून बदनामीचा प्रयत्न केलेला होता.

राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. ११५३/२०१९ दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी ४ मार्च २०२१ रोजी झाली. त्याद्वारे राजेंद्र राऊत यांना याचिका माघारी घ्यावी लागली. त्यामुळे न्यायालयानेदेखील ही याचिका फेटाळली आहे.

या प्रकरणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व आर्यन शुगर असे तत्कालीन संचालक सोपल कुटुंबीय व आर्यन शुगरचे विद्यमान संचालक अविनाश भोसले यांना प्रतिवादी करण्यात आले होते. प्रतिवादींना नोटीस काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मतापर्यंत नेण्यास राजेंद्र राऊत यांच्या याचिकेस अपयश आले. अशाप्रकारे, आर्यन शुगर कारखान्याच्या हस्तांतरण प्रक्रियेची वैधता अबाधित आहे, अशी माहिती दिलीप सोपल यांनी दिली. या याचिकेत राऊत यांच्या वतीने ॲड. बाळकृष्ण जोशी, व्ही. व्ही. पेठे, सरकारच्या वतीने ॲड. ए. ए. अलासपूरकर यांनी काम पाहिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी जनहित याचिका दाखल करणार : राऊत

आर्यन शुगर संदर्भातील आ. राजेंद्र राऊत यांनी आर्यन शुगर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अविनाश भोसले यांच्यामधील झालेला कारखाना बेकायदेशीर हस्तांतरणाचा करार रद्द होऊन बँकेची कर्ज रक्कम तसेच शेतकऱ्यांची FRP रक्कम वसूल होण्यासाठी याचिकेच्या वेळी सुनावणीत स्पष्ट केले. परंतू उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची रक्कम वसूल करुन मागताना तुम्हाला वैयक्तिक याचिकेत मागता येणार नाही, तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी जनहित याचिकेव्दारे तुम्ही मागणी करु शकता, असे स्पष्ट केल्यानंतर आ. राऊत यांच्यातर्फे शेतकऱ्यांची रक्कम वसुल होण्यासाठी व माजी आमदार दिलीप सोपल यांच्याकडूनच बँकेची कर्ज रक्कमही वसूल होण्यासाठी जनहित याचिका दाखल

करण्यास परवानगी दिल्याने ही याचिका माघार घेण्यात आली. उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करण्यास परवानगी दिल्याने आर्यन शुगर संदर्भातील वरील कारणांवरुन ३ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या हितासाठी व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जनहित याचिका दाखल करणार आहोत.