शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आर्यन शुगरच्या हस्तांतरणाची वैधता अबाधित, राऊत यांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 07:55 IST

बार्शी - तालुक्यातील आर्यन शुगरच्या हस्तांतरण व्यवहाराच्या वैधतेस आव्हान देणारी याचिका आमदार राजेंद्र राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली ...

बार्शी - तालुक्यातील आर्यन शुगरच्या हस्तांतरण व्यवहाराच्या वैधतेस आव्हान देणारी याचिका आमदार राजेंद्र राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राजेंद्र राऊत यांना उच्च न्यायालयात माघार घ्यावी लागली आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका  व न्यायमूर्ती व्ही.जी बीशीत  यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेची सुनावणी झाली.

याबाबत माहिती देताना माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले की, आर्यन शुगर कारखान्याचे कायदेशीर हस्तांतरण ५ सप्टेंबर २०१४ ला अविनाश भोसले आणि त्यांच्या इतर संचालक यांच्या हक्कात झाले होते. योगेश सोपल व इतर तत्कालीन संचालकांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेतकऱ्यांची देणी संपूर्ण अदा केली होती. त्यामुळे विद्यमान संचालक अविनाश भोसले यांना गळीत हंगामाची परवानगीदेखील राज्य शासनाकडून घेतली होती, त्याप्रमाणे गाळपदेखील केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या देणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतः भोसले यांनी जबाबदार असल्याचे कबूल केले आहे. ही सर्व वस्तुस्थिती असताना राऊत यांनी राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करून बदनामीचा प्रयत्न केलेला होता.

राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. ११५३/२०१९ दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी ४ मार्च २०२१ रोजी झाली. त्याद्वारे राजेंद्र राऊत यांना याचिका माघारी घ्यावी लागली. त्यामुळे न्यायालयानेदेखील ही याचिका फेटाळली आहे.

या प्रकरणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व आर्यन शुगर असे तत्कालीन संचालक सोपल कुटुंबीय व आर्यन शुगरचे विद्यमान संचालक अविनाश भोसले यांना प्रतिवादी करण्यात आले होते. प्रतिवादींना नोटीस काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मतापर्यंत नेण्यास राजेंद्र राऊत यांच्या याचिकेस अपयश आले. अशाप्रकारे, आर्यन शुगर कारखान्याच्या हस्तांतरण प्रक्रियेची वैधता अबाधित आहे, अशी माहिती दिलीप सोपल यांनी दिली. या याचिकेत राऊत यांच्या वतीने ॲड. बाळकृष्ण जोशी, व्ही. व्ही. पेठे, सरकारच्या वतीने ॲड. ए. ए. अलासपूरकर यांनी काम पाहिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी जनहित याचिका दाखल करणार : राऊत

आर्यन शुगर संदर्भातील आ. राजेंद्र राऊत यांनी आर्यन शुगर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अविनाश भोसले यांच्यामधील झालेला कारखाना बेकायदेशीर हस्तांतरणाचा करार रद्द होऊन बँकेची कर्ज रक्कम तसेच शेतकऱ्यांची FRP रक्कम वसूल होण्यासाठी याचिकेच्या वेळी सुनावणीत स्पष्ट केले. परंतू उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची रक्कम वसूल करुन मागताना तुम्हाला वैयक्तिक याचिकेत मागता येणार नाही, तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी जनहित याचिकेव्दारे तुम्ही मागणी करु शकता, असे स्पष्ट केल्यानंतर आ. राऊत यांच्यातर्फे शेतकऱ्यांची रक्कम वसुल होण्यासाठी व माजी आमदार दिलीप सोपल यांच्याकडूनच बँकेची कर्ज रक्कमही वसूल होण्यासाठी जनहित याचिका दाखल

करण्यास परवानगी दिल्याने ही याचिका माघार घेण्यात आली. उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करण्यास परवानगी दिल्याने आर्यन शुगर संदर्भातील वरील कारणांवरुन ३ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या हितासाठी व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जनहित याचिका दाखल करणार आहोत.