शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सोलापूर जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 12:41 IST

मिलिंद शंभरकर : जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक स्वत: जाणार गावात

सोलापूर : सर्वाधिक कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील शंभर गावांत शंभर पथके पाठवून लसीकरण मोहीम गतिमान करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून या गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली.

लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून सोमवारपासून ग्रामीणसह शहरी भागात लसीकरण मोहीम आणखीन गतिमान होणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग प्रमुखांची चर्चा झाली असून जिल्हाधिकारी, एसपी, जिल्हा परिषदेचे सीईओ, प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, पोलीस ठाणे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शंभर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. सोमवारपासून ही पथके कार्यान्वित हाेतील. या पथकांचे नेतृत्व जिल्हाधिकारी शंभरकर हे स्वत: करतील. शंभरकर हे स्वत: काही गावांमध्ये ठाण मांडून लसीकरणावर नजर ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही काही गावांमध्ये जाणार आहेत.

या शंभर गावांमध्ये लसीकरण मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी संबंधित पथक प्रमुखांची राहणार आहे. संबंधित गावातील लसीकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त पस्तीस टक्के नागरिकांनी दोन डाेस घेतले आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवल साठ ते सत्तर टक्के आहे. साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील शंभर गावांची निवड जिल्हा प्रशासनाने केली असून या गावांमध्ये सोमवारपासून लसीकरण मोहीम राबविण्यासाठी शंभर पथके रवाना होतील, असे शंभरकर यांनी सांगितले.

पथकासोबत पोलीस

प्रत्येक पथकात दोन आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी तसेच त्यांच्यासोबत दोन सहायक असतील. लसीकरण दरम्यान गावात दमदाटी होऊ नये. यासाठी प्रत्येक पथकात एक पोलीस कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहे. पथकासोबत पोलीस कर्मचारी जोडून देण्याची जबाबदारी एसपी कार्यालयाला देण्यात आली आहे.

ओमायक्रॉनचा धसका, रोज पन्नास हजार लसीकरण

ओमायक्रॉनचा धोका सर्वत्र निर्माण झाल्याने सर्वत्र लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती सर्वत्र पसरली असून लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. रोज पन्नास ते साठ हजार नागरिक लस घेत आहेत. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना शासकीय नागरी सुविधा न देण्याचा निर्णय देखील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लोक भीतीने लसीकरण केंद्रावर गर्दी करताहेत. लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित रहा, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोन बीअर शॉपीवर कारवाई

मास्क न वापरल्याबद्दल तसेच लसीकरण करून न घेतल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुरातील दोन बीअर शॉपीवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी दहा हजारांचा दंड केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय