शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अविकसित क्षेत्रांसाठी व्हावा विज्ञानाचा उपयोग - प्रकाश आमटे

By admin | Updated: January 6, 2017 21:29 IST

ज्ञान-विज्ञान संपादनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या अविकसित क्षेत्रातील भावंडांच्या हितासाठी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे

 ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 6 -  समाजसेवेचा वसा मला बाबांकडून थेट मिळाला व भामरागडच्या जंगलातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञान-विज्ञान संपादनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या अविकसित क्षेत्रातील भावंडांच्या हितासाठी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले.विश्वशांती गुरुकुल निवासी विद्यालय, वाखरी, एमआयटी अ‍ॅकॅडमी इंजिनीअरिंग, आळंदी (पुणे) आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या राष्ट्रीय पातळीवरील ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, रोबोटिक्स युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. ओहोळ, एमआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे, प्रकल्प संचालक डॉ. पी. एन. प्रसाद, विभागप्रमुख प्रा. प्रभा कासलीवाल, पंढरपूर विश्वशांती गुरूकुलच्या प्राचार्या के. सुनिता व श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. दोन दिवसीय स्पर्धेची संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ अशी आहे.डॉ. प्रकाश बाबा आमटे म्हणाले, आपल्या देशात कमालीची विषमता आहे. एकीकडे अफाट संपत्ती आणि दुसरीकडे टोकाचे दारिद्र्य आहे. आज भारतात ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे, नवीन तंत्रज्ञान विकसित करावे व अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेवटच्या माणसाला दोन वेळचे जेवण मिळेल, अशा प्रकारचा विकास करावा. आदिवासी भागातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर केल्या पाहिजेत. त्यांना त्या भागामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार उपलब्ध करून दिला तर, या भागाचा चांगला विकास होईल. सर्व घडण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. आज केंद्र सरकारकडून येणाºया विविध योजना आदिवासींपर्यंत जातच नाहीत. त्या मधल्यामध्ये झिरपून जातात. हे कसे होते, याचा शोध घेऊन ते नाहीसे केले तर तेथील लोकांचे जीवनमान सुधारून आपल्या देशाची निश्चितच उन्नती होईल, असे सांगितले.प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या निमित्ताने निघालेली ही आळंदी ते पंढरपूर अशी ज्ञान-विज्ञानाची दिंडी आहे. पंढरपूर ही विकार-विकल्प दूर करणारी ज्ञान पंढरी व्हावी, या दृष्टीने केला जाणारा हा प्रयत्न असून ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विश्वशांतीचा संदेश जगाला देण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठीच्या कार्यक्रमात पीडित व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या   डॉ. प्रकाश बाबा आमटे यांंच्यासारखा मार्गदर्शक आज लाभल्याने शुभाशिर्वाद लाभल्याचे समाधान मिळाले, असे सांगितले.प्रास्ताविक डॉ. पी. एन. प्रसाद यांनी केले. स्पर्धेविषयीची संकल्पना कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे यांनी विशद केली. सूत्रसंचालन प्रा. प्रेरणा त्रिपाठी यांनी केले. गणेशकुमार यांनी आभार मानले.

५००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर येथे आयोजित चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, नांदेड, लातूर आदी शाळांमधून ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर आधारित विविध रोबोंचे प्रात्यक्षिक या स्पर्धेतून ते दाखविणार आहेत.
पंढरपूर स्मार्ट ज्ञान पंढरी व्हावी
‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर आधारित ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा ही गांधींजींच्या स्वप्नातील स्मार्ट खेडी निर्माण करणारी ठरून ‘पंढरपूर ही स्मार्ट ज्ञान पंढरी व्हावी’ हा या उपक्रमामागील प्रेरणास्त्रोत आहे. ‘नमामि गंगे’प्रमाणे ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प सुरू करून येथे गीतेच्या १८ अध्यायांप्रमाणे घाट उभे करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.