शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अवकाळी पावसाचा फटका; सोलापूर जिल्ह्यातील २३०० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:27 IST

३८०० शेतकरी बाधित, सर्वाधिक नुकसान पंढरपुरात

सोलापूर : अवकाळी पावसाने मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक गावांना तडाखा बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील २३०० हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. जवळपास ३८०० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून जवळपास १६०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक गावे पावसामुळे बाधीत झाली आहेत.

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. द्राक्ष बागा, डाळिंब, केळी, आंबा, लिंबू, पपई, ज्वारी तसेच बेदाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १३ एप्रिलच्या सायंकाळी साडेपाच दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाले. विद्युत खांब उखडले गेले. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १४ एप्रिल रोजी कृषी अधिकारी नुकसान झालेल्या गावात जाऊन बाधित शेतकऱ्यांची संवाद साधला. नुकसानीत शेती पिकांची माहिती घेतली.

सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर, मोहोळ तसेच दक्षिण सोलापूरमध्ये झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस नुकसानीत पिकांचे माहिती घेण्याचे काम सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दोघे जखमी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन व्यक्ती जखमी झाली आहेत. तसेच बारा मोठ्या जनावरांचे खूप छान झाले असून दोन लहान जनावरे दगावली आहेत. यासोबत २२ कच्चा घरांचे नुकसान झाले आहे, सर्वाधिक नुकसान मंगळवेढा तालुक्यात झाले असून नऊ गावे बाधित झाले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRainपाऊस