शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळी पावसाचा फटका; सोलापूर जिल्ह्यातील २३०० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:27 IST

३८०० शेतकरी बाधित, सर्वाधिक नुकसान पंढरपुरात

सोलापूर : अवकाळी पावसाने मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक गावांना तडाखा बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील २३०० हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. जवळपास ३८०० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून जवळपास १६०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक गावे पावसामुळे बाधीत झाली आहेत.

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. द्राक्ष बागा, डाळिंब, केळी, आंबा, लिंबू, पपई, ज्वारी तसेच बेदाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १३ एप्रिलच्या सायंकाळी साडेपाच दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाले. विद्युत खांब उखडले गेले. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १४ एप्रिल रोजी कृषी अधिकारी नुकसान झालेल्या गावात जाऊन बाधित शेतकऱ्यांची संवाद साधला. नुकसानीत शेती पिकांची माहिती घेतली.

सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर, मोहोळ तसेच दक्षिण सोलापूरमध्ये झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस नुकसानीत पिकांचे माहिती घेण्याचे काम सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दोघे जखमी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन व्यक्ती जखमी झाली आहेत. तसेच बारा मोठ्या जनावरांचे खूप छान झाले असून दोन लहान जनावरे दगावली आहेत. यासोबत २२ कच्चा घरांचे नुकसान झाले आहे, सर्वाधिक नुकसान मंगळवेढा तालुक्यात झाले असून नऊ गावे बाधित झाले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRainपाऊस